HW News Marathi
महाराष्ट्र

गौरी गणपतीला येणाऱ्या चाकरमान्यांचा क्वारंटाईन कालावधी ७ दिवस करण्याचे पालकमंत्री उदय सामंत यांचे निर्देश

सिंधुदुर्ग | यंदाच्या कोरोना संकटामुळे गणेशोत्सवावर विघ्न आले आहे. काही मंडळे गणपती बसवणार नाही आहेत. अशा काळात कोकणात मोठ्या उत्साहाने साजरा केला जातो अशा या सणाबाबतीत काही नियम बदलले आहेत.

कोकणात गौरी गणपती सणाच्या निमित्ताने येणाऱ्या चाकरमानी लोकांचा क्वारंटाईन कालावधी १४ दिवसांवरून ७ दिवस करावा, असे निर्देश पालकमंत्री उदय सामंत यांनी जिल्हा शांतता समितीच्या बैठकीत दिले आहेत. तर खासदार विनायक राऊत यांनी गणेश भक्तांच्या भाविकांना तडा जाणार नाही अशी कोविड नियमावली असावी असे सुचविले.

सिंधुदुर्ग जिल्हा दक्षता शांतता समितीची बैठक सिंधुदुर्गमध्ये झाली. पालकमंत्री उदय सामंत यांनी अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीचे इतिवृत्त ग्राह्य धरता येणार नाही ते रद्द झाले असे समजा असे निर्देश जिल्हाधिकारी यांना दिले. गणेश चतुर्थी सणात येणाऱ्या गणेशभक्तांना सुलभ पद्धतीने ई पास मिळवता यावेत, त्यांच्या आरोग्याची तपासणी करावी, येण्यासाठी बस सुविधा करावी, महामार्गावर टोल फ्री योजना आखावी आणि मुंबई गोवा महामार्ग योग्य तिथे दुरुस्ती करावी याबाबत मुख्यमंत्री, सार्वजनिक बांधकाम, मुख्य सचिव यांच्याशी चर्चा करून भूमिका ठरविली जाईल असे पालकमंत्री सामंत यांनी या बैठकीत सांगितले.

गौरी-गणपती सणाच्या काळात किती लोकांना आगमन,भजन, प्रतिष्ठापणा व विसर्जन करताना सहभागी होता येईल, याबाबत योग्य ती भूमिका घेऊन शिफारस करायला हवी. गणपती सणाच्या निमित्ताने पारंपारिक भजन, आरती आपण थांबू शकत नाहीत, त्यामुळे त्याबाबत निर्णय घेताना गणेश भक्तांचा गैरसमज वाढणार नाही याकडे लक्ष दिले जाणार आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

‘तन्मय फडणवीस माझा दूरचा नातेवाईक’,फडणवीसांनी हात झटकले !

News Desk

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नागरिकांना महाराष्ट्र दिनाच्या शुभेच्छा

Aprna

वीज बिल आता सरासरीने देणार, उर्जामंत्र्यांनी दिली महत्त्वाची माहिती

swarit