HW News Marathi
महाराष्ट्र

राहुल गांधींचा नाव न घेता मोदी सरकारवर जोरदार हल्लाबोल


औरंगाबाद | औरंगाबादमध्ये जालन्यातील एका कंपनीत काम करणाऱ्या १४ मजूरांचा अपघाती मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. सटाणा शिवारात ( करमाड डीएमआयसी परिसर) रेल्वे रुळावर थकून झोपलेले १६ मजूर मालवाहू रेल्वेखाली चिरडली गेले आहेत. लॉकडाऊनमुळे जालन्यात अडकलेले मजूर रेल्वे रुळावरुन औरंगाबादच्या दिशेने पायी येत होते.

याच पार्श्वभूमीवर काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांनी नाव न घेता मोदी सरकारवर जोरदार हल्लाबोल केला आहे. रेल्वे अपघातात मजूर भाऊ-बहिणींच्या मृत्यूच्या बातमीनं मी दुःखी आहे,’ असं राहुल गांधी म्हणाले. ‘राष्ट्र उभारणीत महत्त्वाची भूमिका बजावणाऱ्या कामगारांबरोबर होत असलेल्या व्यवहारावर आपल्याला लाज वाटली पाहिजे. मृत मजुरांच्या कुटुंबीयांप्रति मी सहवेदना व्यक्त करतो. तसेच जखमी लवकरात लवकर बरे व्हावेत, अशी प्रार्थनाही यावेळी राहुल गांधीनी केली.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.
Some error occurred

Related posts

पोलिसांच्या आरोग्य रक्षणासाठी मनसेही पुढे सरसावली

News Desk

शरद पवारांच्या ताफ्यातील पोलिसांच्या गाडीला अपघात

News Desk

“इन्शा अल्लाह हम तुम्हारे साथ है”- अर्जुन खोतकर

News Desk