HW News Marathi
देश / विदेश

मोदी सरकारने कृषी कायद्याला २ वर्षे नव्हे कायमची स्थगिती द्यावी !

नवी दिल्ली । मोदी सरकारच्या ३ कृषी कायद्यांविरोधात तब्बल २ महिन्यांहून अधिक काळ दिल्लीत सुरू असलेल्या शेतकऱ्यांच्या शांततापूर्ण आंदोलनाला प्रजासत्ताकदिनी गालबोट लागले. दरम्यान, या पार्श्वभूमीवर दिल्लीत सध्या तणावपूर्ण शांतता असताना शेतकऱ्यांच्या हक्कांसाठी काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांनी मोदी सरकारला एक पर्याय दिला आहे. “मोदी सरकार कृषी कायद्याला २ वर्षे स्थगिती देणार होते. ती स्थगिती त्यांनी कायमची द्यावी”, अशी मागणी राहुल गांधींनी केली आहे. दिल्लीत आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.

शेतकरी आंदोलनाच्या आणि मागण्यांच्या पार्श्वभूमीवर मोदी सरकारला उद्देशून बोलताना राहुल गांधी म्हणाले की, “तुम्ही २ वर्षे कृषी कायदे स्थगित करणार होता. ते कायमचे स्थगित करा. वाटल्यास पुन्हा प्रयत्न करा. आम्ही त्यासाठी मदत करु. शेतकऱ्यांसह सर्वांशी चर्चा करा.” पुढे बोलताना राहुल गांधी म्हणाले की, “कृषी क्षेत्राला सुधारणांची गरज आहे हे आम्हालाही मान्य आहे. पण तुम्ही २ वर्षे जे कृषी कायदे स्थगित करणार होता. ते कायमचेच स्थगित करा.”

शेतकऱ्यांनी एक इंचही मागे हटू नये । राहुल गांधी

“शेतकऱ्यांवर लाठीमार करुन पंतप्रधान देशाला दुबळे बनवत आहे. मोदी सरकार शेतकऱ्यांशी चर्चा करण्याऐवजी त्यांच्यावर लाठीमार करत आहे. शेतकऱ्यांनी एक इंचही मागे हटू नये, आम्ही तुमच्यासोबत आहोत”, असे आश्वासनही यावेळी राहुल गांधींनी शेतकऱ्यांना दिले आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

देशाच्या सुरक्षेबाबत राहुल गांधींना काहीही समजत नाही !

News Desk

ओडिशात ‘तितली’ चक्रीवादळामुळे ५७ जणांचा मृत्यू

swarit

ट्रम्प यांचा भारतात येण्यास नकार, भारत-अमेरिका संबंध धोक्यात ?

News Desk