HW News Marathi
महाराष्ट्र

रामदास कदमांचे प्रभादेवी परिसरातील दुकानांवर छापे

मुंबई | महाराष्ट्र सरकारने प्लास्टिकबंदी करून देखील राज्यात बऱ्याच ठिकाणी अजूनही सर्रासपणे प्लास्टिकचा वापर केला जात असल्याची चित्र दिसते. सरकारच्या निर्णयानुसार एक एप्रिलपासून राज्यात सर्वत्र प्लास्टिक तसेच प्लास्टिक पिशव्या वापरास बंदी आहे.आज पर्यावरण मंत्री रामदास कदम यांनी स्वत: प्रभादेवी येथील श्रीसिद्धिविनायक मंदिराच्या आवारात असलेल्या दुकानांवर प्लास्टिकबंदीची कारवाई केली आहे. या कारवाईत त्यांना बऱ्याच दुकानदारांकडून प्लास्टिकचा वापर होत असल्याचे आढळले. या दुकानदारांवर पुढील कारवाईची प्रक्रिया सुरु आहे.

पर्यावरण मंत्री रामदास कदम यांनी श्रीसिद्धिविनायक मंदिराच्या आवारात असलेल्या सर्व दुकानांमध्ये जाऊन पाहणी केली. येथील ज्या दुकानांमध्ये प्लास्टिक आढळून आले ते तात्काळ काढून टाकण्याचे आदेशही रामदास कदम यांनी दिले. त्याचप्रमाणे रामदास कदम यांनी त्या दुकानदारांना पुन्हा प्लास्टिकचा वापर न करण्याच्या सूचनादेखील दिल्या आहेत. रामदास कदम हे दर्शनासाठी श्रीसिद्धिविनायक मंदिरात आलेले असताना त्यांना एका व्यक्तीच्या हातात प्लॅस्टिकची पिशवी दिसली. त्यानंतर त्यांनी त्यांनी त्या परिसरात तपासणी करून तात्काळ ही कारवाई केली.

प्लास्टिकचा वापर हा पर्यावरणासाठी अत्यंत घातक असल्याने त्याचा वापर थांबावा यासाठी महाराष्ट्र सरकारने प्लास्टिक बंदी केली आहे. परंतु प्लास्टिकऐवजी कोणताही पर्याय उपलब्ध नसल्याने लोकांकडून सर्रास प्लास्टिकचाच वापर केला जात आहे. सुरुवातीच्या काळात ज्या व्यक्तीकडे प्लास्टिकची वस्तू आढळेल त्या व्यक्तीला ५००० रुपये दंड आकारला जात होता. परंतु हळूहळू हा दंडदेखील शिथिल झाला.

काय म्हणाले रामदास कदम

“मी आज सिद्धिविनायक मंदिरात आलो होतो तेव्हा मला एका माणसाच्या हातात प्लास्टिकची पिशवी दिसली म्हणून मी आसपासच्या दुकानात जाऊन ताबडतोब पाहणी केली असता प्लास्टिक च्या पिशव्या आढळल्या . त्यांच्यावर कारवाईची प्रक्रिया सुरु आहे,” असे रामदास कदम यांनी यावेळी म्हटले आहे.

राज्यातील प्लास्टिकबंदी संदर्भात मंत्रालयात घेण्यात आलेल्या आढावा बैठकीत पर्यावरण मंत्री रामदास कदम बोलत होते. राज्यात प्लास्टिकबंदी मोहीम सुरू असून व्यापाऱ्यांना आणि उत्पादन करणाऱ्या कंपन्यांना तीन महिन्यांची मुदत दिली होती. ती मुदत संपत असून यापुढे मुदतवाढ देण्यात येणार नाही. तसेच वैयक्तिक कारवाईची मोहीम सुरू करावी, असे निर्देशही कदम यांनी यावेळी दिले.

त्याचप्रमाणे “प्लास्टिक उत्पादन करणाऱ्या कंपन्या आणि व्यापाऱ्यांवर कडक कारवाई करून राज्यातील प्लास्टिकबंदीची मोहीम काटेकोरपणे राबवावी. तसेच पुणे, मुंबईसह संपूर्ण महाराष्ट्रात प्लास्टिकबंदी कायम असून यापुढे व्यापाऱ्यांना प्लास्टिक वापरासाठी कोणतीही मुदतवाढ दिली जाणार नाही,” असे आदेश पर्यावरण मंत्री रामदास कदम यांनी दिले आहेत.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

या देशात भाजप समर्थकांना सात खून माफ आहेत का? – नवाब मलिक

News Desk

मुख्यमंत्र्यांना सद्बुद्धी मिळवी, यासाठी दिल्लीत महाआरती करणार, राणा दाम्पत्याची घोषणा

Aprna

’31 डिसेंबरपर्यंत ठाकरे सरकार आणि 40 चोरांचे घोटाळे बाहेर आले असतील’- किरीट सोमय्या

News Desk