HW News Marathi
महाराष्ट्र

शेतकऱ्यांच्या लाँग मार्चला राज ठाकरेंचा ही पाठिंबा

मुंबई | शेतकऱ्यांच्या पिकाला हमीभाव, कर्जामाफी, शेतकरी आत्महत्या, गारपीट आणि शेतकऱ्यांच्या मुलांना शिक्षणात सवलती या सर्व मागण्या मान्य होण्यासाठी हा लाँग मार्च मोर्चा काढण्यात आला आहे. शेतकऱ्यांच्या लाँग मार्च मोर्चाला महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी देखील पाठिंबा दिला आहे. राज ठाकरे यांनी स्वत: किसान सभेचे सचिव अजित नवले यांना फोन केला.

हा लाँग मार्च मोर्चा मुंबईत आल्यानंतर मनसैनिक देखील सहभागी झाले आहेत. मनसैनिकांनी या लाँग मार्च मोर्चाचे स्वागत केले आहे. या लाँग मार्च मोर्चाला आम आदमी पार्टीने पाठिंबा दिला आहे. आप सुद्धा शेतकऱ्यांच्या खांद्याला खांदा लावून सरकार विरोधात लढणार आहे. हा मोर्चा नाशिकमधून निघालेला आहे. येत्या १२ मार्चला मुंबईला विधान भवनात धडकणार आहे. यामध्ये महाराष्ट्रातील हजारो शेतकऱ्यांनी सहभागी नोंदवली आहे.

या मोर्चामध्ये शेतकऱ्यांनी सरकार विरोधात ‘नरेंद्र मोदी किसान विरोधी’ असे फलक हाता घेऊन शेतकरी मुंबईच्या दिशेने रवाना झाले आहेत. हा मोर्चा शनिवारी ठाण्याजवळील भिवंडी इथे पोहोचला आहे. भाजप सरकारने सत्तेत येण्यासाठी शेतकऱ्यांना खोटी आश्वासने दिली होती. सरकार स्थापन झाल्यानंतर भाजपला त्यांच्या आश्वसनाचा विसर पडला आहे. राज्य सरकारने गारपिटी ग्रस्त शेतकऱ्यांना अजूनपर्यंत नुकसान भरपाई दिली नाही. या लाँग मार्चमध्ये महाराष्ट्रातील कानाकोपऱ्यातील शेतकरी यात सामील झाली आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

शिवसेना नेते आनंदराव आडसुळांना दिलासा नाहीच!

News Desk

डोक्यात सडकी हवा आणि पार्श्वभागात घुसलेला बाण, हेच तुमचे भविष्य! सामनातून भाजपवर निशाणा

News Desk

“पाठीत खंजीर खुपसणाऱ्या शिवसेनेला धडा शिकवण्यासाठी मुंबई महापालिका जिंका” – चंद्रकांत पाटील

News Desk