HW News Marathi
महाराष्ट्र

महाविकास आघाडीचा एकही आमदार फुटणार नाही, राजस्थानची पुनरावृत्ती महाराष्ट्रात होणार नाही – जयंत पाटील

मुंबई | देशात सध्या राजकीय वर्तुळात अनेक गोष्टी घडत आहेत. मध्य प्रदेशपाठोपाठ राजस्थानमध्येही काँग्रेसचे सरकार धोक्यात आले आहे. सरकारविरोधात बंड करणाऱ्या सचिन पायलट यांना राजस्थानच्या उपमुख्यमंत्री पदावरून हटवण्यात आले. याच दरम्यान, महाराष्ट्रातही ऑक्टोबरमध्ये सरकार पाडण्याच्या चर्चांना उधाण आले आहे. मात्र या सर्व चर्चा राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जयंत पाटील यांनी फेटाळून लावल्या आहेत.जयंत पाटील म्हणाले की, महाराष्ट्रात महाविकास आघाडीचा एकही आमदार फुटणार नाही आणि फुटला तरी ३ पक्षांच्या ताकदीसमोर तो निवडूनच येणार नाही.

तसेच, राज्यातील महाविकास आघाडीचे सरकार भक्कम आहे. त्यामुळे महाराष्ट्रात राजस्थानची पुनरावृत्ती होण्याचा प्रश्नच नाही. सरकारमधील आमदार फुटलाच तर फुटलेल्या आमदारासमोर आमच्या तिन्ही पक्षाचा एकच उमेदवार उभा राहिल. त्यामुळे तीन पक्षाच्या ताकदीसमोर फुटलेला आमदार निवडूनच येऊ शकणार नाही, असे जयंत पाटील यांनी स्पष्ट केले आहे.

राज्यात कुणाची किती ताकद आहे ते बघायचे असेल तर चारही पक्ष वेगवेगळे लढूया. कुणाच्या जागा जास्त येतात ते बघू, असे आवाहन भाजप नेते चंद्रकांत पाटील यांनी केले होते. चंद्रकांत पाटील यांच्या या आव्हानावर देखील जयंत पाटील यांनी प्रत्युत्तर दिले आहे. भाजपाने एकदा स्वतंत्र लढून बघावे, राज्यात त्यांना ६०-६५ जागावरच समाधान मानावे लागेल. त्यापेक्षा ते अधिक जागा जिंकूच शकत नाहीत, असा टोला जयंत पाटील यांनी चंद्रकांत पाटील यांना लगावला आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

१ वर्षापुर्वी पंकजा मुंडेंनी थेट भाजपला ललकारलं होतं !

News Desk

“‘लाव रे तो व्हिडिओ…’ च्या वादळी सभांमुळं”, रोहित पवारांचं राज ठाकरेंना प्रत्युत्तर

News Desk

आमच्या नेत्याचं शिक्षण काढू नका, आमच्या वाटेला जाऊ नका, राणे समर्थकांचा विनायक राऊत यांना इशारा

News Desk