HW News Marathi
Covid-19

लसीचे दोन्ही डोस घेतले? तर तुमच्यासाठी निर्बंध शिथिल ,राजेश टोपेंची माहिती

मुंबई | देशात कोरोनाचं संक्रमण अद्यापही कमी झालेलं नाही. यावर मात म्हणजे लसीकरण. देशात लसीकरणाची मोहीम जानेवारी पासून सुरु झाली होती आणि अजूनही लसीकरण चालूच आहे. मुंबईतील लोकल कधी सुरू होणार, तसेच राज्यात अनलॉक कधी होणार, अशा अनेक मुद्द्यांवर आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी भाष्य केले आहे. दिसालादायक म्हणजे लसीचे दोन्ही डोस घेतलेल्यांसाठी निर्बंध शिथिल करण्याची गरज असल्याचे राजेश टोपे म्हणाले आहेत.

अनलॉक केव्हा होणार?

अनलॉकची प्रतीक्षा देशातले सगळेच करत आहेत. ICMR ने पहिला रुग्ण आढळल्यापासून काही नियम आखून दिले आहेत. त्या नियमानुसारच महाराष्ट्र काम करत आहे. ICMR सिरो सर्व्हे केला आहे. त्यानुसार त्यांना आम्हाला सांगाने प्रोटोकॉल द्यावे. कशाप्रकारे निर्बंधामध्ये सुट देता येईल या संदर्भात सुचना द्याव्या. कारण आताच केंद्राच्या टिम येऊन गेल्या त्यांनी निर्बंध पाळणे, टेस्टींग वाढवणे, अशा सुचना दिल्या. आम्ही त्यांच्या म्हणण्याप्रमाने आमीची वर्तवणुक असते. ICMR ने मार्गदर्शन केल्यास आम्हाला निर्णय घेता येईल.

अजित पवार काय म्हणाले?

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी एक महत्वाची मागणी केली आहे. कोरोनाचे दोन डोस घेतलेल्यांना आता बाहेर पडण्याची परवागनी दिली पाहिजे असं माझं वैयक्तिक मत आहे. याबाबत मी दोन दिवसात मुख्यमंत्र्यांशी बोलणार आहे, असं राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सांगितलं आहे. त्यांना बाहेर पडायला टप्प्याटप्प्याने सुरुवात केली पाहिजे, असं माझं वैयक्तिक मत आहे. याबाबत मी परवा मुख्यमंत्र्यांशी बोलेल. पण लोकांना बाहेर पडण्याची मुभा द्यावी की देऊ नये याबाबतचे वेगवेगळे मतप्रवाह आहेत. काहींच्या मते इथून पुढे १०० ते १२० दिवस अत्यंत महत्त्वाचे आहेत. या दिवसात लोकांनी नियमावलीचं तंतोतंत पालन केलं पाहिजे. सोलापुरातील एका गावात मी गेलो होतो. तेव्हा लोक मास्कशिवाय फिरताना दिसले. अशी बेपर्वाई बरी नाही. एक देखील बाधित व्यक्ती अनेकांना बाधित करू शकते. त्यामुळे बारकाईने वागण्याची गरज आहे, असं पवार म्हणाले आहेत.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

मुंबईकरांची चिंता वाढली, महाराष्ट्रातील रुग्णांची संख्या १० वर

News Desk

इंधन दरवाढ कायम, जाणून घ्या…आजचे पेट्रोल-डिझेलचे भाव

News Desk

परळी शहरात ८ दिवसांसाठी संपूर्ण संचारबंदी घोषित

News Desk