HW News Marathi
महाराष्ट्र

राज ठाकरेंच्या भूमिकेविरोधात आमदार राजू पाटील, दि.बा.पाटलांच्या नावासाठी रस्त्यावर

नवी मुंबई। नवी मुंबई विमानतळाच्या नामकरणाचा वाद शिगेला पोहोचला आहे. नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला दि. बा. पाटील यांच नाव देण्याची मागणी जोर धरत आहे. अस जरी असल तरी यादरम्यान मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी या विमानतळाला छत्रपती शिवाजी महाराजांचंच नाव असलं पाहिजे असं स्पष्ट मत व्यक्त केलं आहे.

तर आज (२४ जून ) ( प्रकल्पग्रस्त भूमिपुत्रांनी गुरुवारी सकाळपासून सिडको घेराव आंदोलन सुरु केले आहे. दरम्यान आयोजित आंदोलनात मनसे चे आमदार राजू पाटील सहभागी झाले आहेत.नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला दि बा पाटील यांचं नाव देण्याच्या मागणीसाठी आज सिडकोवर हा धडक मोर्चा काढण्यात आला आहे.

*नवी मुंबई विमानतळाला दि.बा पाटील नाव द्या – राजू पाटील*

“ही परिस्थिती मुख्यमंत्र्यांना टाळता आली असती. एकीकडे तुम्ही तिसरी लाट येणार सांगत असताना आम्हाला रस्त्यावर उतरायला का लावलं? त्यांना जर काळजी नसेल तर आम्हालाही नाही. आमच्या मागणीसह आम्ही रस्त्यावर आलो आहोत,” असं राजू पाटील यांनी पत्रकारांशी बोलताना आपली प्रतिक्रिया व्यक्त केली. राज ठाकरेंनी शिवरायांचं नाव असावं अशी भूमिका घेण्यासंबंधी विचारण्यात आलं असता ते म्हणाले की, “जर ते विमानतळ मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाचा विस्तारीत भाग असेल तर त्याला तांत्रिक बाब म्हणून आपोआप शिवरायांचं नाव येणार आहे, ती काही आमची मागणी नाही. नवीन विमानतळ होणार असेल तर दि बा पाटील यांचंच नाव दिलं जावं”. आम्हाला संघर्ष करायचा नसून आमची ताकद दाखवायची आहे असंही ते यावेळी म्हणाले.

*उद्धव ठाकरेंचा हा बालहट्ट – भाजप*

नवी मुंबईच्या विमानतळाला बाळासाहेब ठाकरे यांचं नाव देण्याचा आग्रह म्हणजे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा बालहट्ट आहे. उद्धव ठाकरे हे मोठे नेते आहेत. पण त्यांना स्थानिक भूमीपुत्रांबद्दल अजिबात आस्था नाही. भाजप या मुद्द्यावर राजकारण अजिबात करत नाही, परंतु आम्ही स्थानिक भूमीपुत्रांच्या सोबत आहोत, अशी प्रतिक्रिया भाजप नेते रविंद्र चव्हाण यांनी दिली.

*राज ठाकरे यांची विमानतळाबाबत भूमिका*

काही दिवसांपूर्वी पनवेलचे आमदार प्रशांत ठाकूर यांनी कृष्णकुंजवर जाऊन मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांची भेट घेतली होती. मनसेनं पाठिंबा द्यावा, अशी मागणी केली होती. परंतु, राज ठाकरे यांनी वस्तुस्थितीत मांडत नवी मुंबईतील विमानतळ हा मुंबई विमानतळाचा विस्तार आहे, त्यामुळे त्या विमानतळाचे नाव छत्रपती शिवाजी महाराज हेच राहणार आहे, असं सांगितलं. मात्र, राज ठाकरेंच्या भूमिकेविरोधात राजू पाटील यांनी भूमिका घेतली आहे. राजू पाटील यांनी फेसबुक पोस्ट करत माहिती ही दिलीये.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

परळीत एका महिलेचा खून; अवघ्या ४ तासांत आरोपी ताब्यात

News Desk

शेतकरी आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी काँग्रेसचे आज  राज्यव्यापी आंदोलन – बाळासाहेब थोरात

News Desk

शेतकऱ्यांना विश्वासात घेऊनच बारसू तेल शुद्धीकरण प्रकल्प होणार! – उद्योगमंत्री उदय सामंत

Aprna