HW News Marathi
महाराष्ट्र

अदानी-अंबानी यांना शेती क्षेत्रात व्यापार करता यावा म्हणून कृषी विधेयकं मंजूर केली, राजू शेट्टींचा गंभीर आरोप

पुणे | केंद्र सरकारने ३ कृषी कायदे केले त्या विरोधात शेतकऱ्यांकडून विरोध केला जात आहे. याच पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांचे गेले अनेक दिवस दिल्लीत आंदोलन सुरु आहे. याच मुद्यावर स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी यांनी पुण्यात पत्रकार परिषद घेतली. “शेतकऱ्यांच्या हक्कासाठी आंदोलन करताना आम्ही रस्ते रोखले. झाडं आडवी टाकली, टायर पेटवले पण रस्ता खोदण्याचं धाडस कधी केलं नव्हतं. पण सरकारनेच रस्त्यावर खंदक खोदून दिल्लीच्या दिशेने येणारे शेतकऱ्यांचे ट्रॅक्टर रोखले” असे स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी म्हणाले आहेत.

“शेतकऱ्यांच्या मनात काय आहे?. त्यांच्या भावना समजून घेण्याऐवजी आंदोलनाला प्रांतीक रंग देण्याचा प्रयत्न केला जात आहे. हे आंदोलन कुठल्या जाती-धर्माचं नाही, देशातील शेतकऱ्यांचं आंदोलन आहे” असे राजू शेट्टी म्हणाले. “सरकारने जी तीन कृषी विधेयक मंजूर केली. त्या विधेयकांची कुठल्याही शेतकऱ्याने किंवा शेतकरी संघटनेने मागणी केली नव्हती. लॉकडाऊनमध्ये जगाची अर्थव्यवस्था कोलमडली. आपला देशही अपवाद नव्हता.पण शेती क्षेत्र या काळात स्थिर होतं. त्यावेळीच हा बिझनेस कॉर्पोरेट हाऊसेसना दिसला. अदानी-अंबानी यांना शेती क्षेत्रात व्यापार करता यावा, लॉकडाऊनमधला त्यांचा तोटा भरुन काढण्यासाठी पायघडया घालून ही तीन विधेयकं मंजूर केली” असा गंभीर आरोप यावेळी राजू शेट्टी यांनी केंद्र सरकारवर केला आहे.

“सरकार शेतकऱ्यांवर लाठीहल्ला करत आहे, पाण्याचा फवारा मारत आहे त्यामुळे परिस्थिती चिघळत आहे. शेतकरी अशांत झाला तर देश अशांत होईल. फक्त पंजाब,हरयाणा आणि उत्तर भारतातील शेतकऱ्यांच हे आंदोलन नाही. हे देशाचं आंदोलन आहे. याच भान सरकारने ठेवावं. सरकारची भूमिका आईची असली पाहिजे . शेतकऱ्याला आरोपी ठरवू नये. त्याला समजून घेतलं पाहिजे. शेतकऱ्यांच्या तरुण मुलांची माथी भडकली तर कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो” असे राजू शेट्टी म्हणाले आहेत.

केंद्र सरकारच्या निषेधार्थ, उद्या (८ डिसेंबर) भारत बंदची हाक दिली आहे. त्या बंदमध्ये देशातील जनतेने उस्फूर्तपणे सहभागी व्हावे. एक दिवस बळी राजासाठी म्हणून सर्वांनी सहभाग घेतल्यास, केंद्र सरकारला हा कायदा मागे घ्यावा लागेल. तसेच मी उद्या कोल्हापूर येथे सहभागी होणार आहे असे राजू शेट्टी म्हणाले आहेत. दरम्यान, महाराष्ट्रातूनही या भारत बंदला मोठ्या प्रमाणात पाठिंबा देण्यात आला आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

शिवसेना-राणेंमध्ये वाद मात्र फडणवीस-मुख्यमंत्र्याची बंद दाराआड चर्चा!

News Desk

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, अशोक चव्हाणांविरोधात विनायक मेटेंची उच्च न्यायालयात याचिका

News Desk

रोगजंतुंचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी साबणाने वेळोवेळी हात धुण्याची सवय आवश्यक

swarit