HW News Marathi
महाराष्ट्र

तर शेतकऱ्यांची मुले हातात दगड घेतील…राजू शेट्टी यांचा केंद्राला इशारा 

कोल्हापूर | बहुमताच्या बळावर भलेही तुम्ही लोकसभा आणि राज्यसभेत कायदे पास करत असाल पण त्याची अंमलबजावणी कसे करता हे पाहायचेच आहे, असे स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी यांनी म्हटले आहे. केंद्र सरकारने काल (२० सप्टेंबर) राज्यसभेत कृषी क्षेत्राबद्दलची विधेयके मंजूर करुन घेतली होती.

केंद्र सरकारने राजकीय पक्षांच्या मदतीने शेतीला कॉर्पोरेटच्या घशात घातले आणि शेतकऱ्यांना शेतीतून बाहेर काढायचा प्रयत्न केला आहे. मात्र, हमीभाव हा शेतकऱ्यांचा हक्क आहे, हे सरकारने याद राखावे, असा इशारा शेट्टी यांनी केंद्र सरकारला दिला.

शेतकऱ्यांचा हमीभावाचा अधिकार काढून घेण्याचा प्रयत्न केला, तर करोडो शेतकऱ्यांची पोरं हातात दगड घेतील. त्यानंतर मात्र आमच्या हातातील दगडांमुळे तुमच्या काचा शिल्लक राहणार नाहीत, असा इशारा राजू शेट्टी यांनी सरकारला दिला.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.
Some error occurred

Related posts

Maharashtra Budget 2021-2022 : राज्यात कृषीपंप जोडणी धोरण राबवणार, महावितरणला १५०० कोटी रुपये प्रस्तावित

News Desk

शिवसेनेने घेतलेली भूमिका म्हणजे विनाशकाले विपरीत बुद्धी !

News Desk

श्रीकृष्णानंतर शिवाजी महाराज एकमेव दक्ष व्यक्तिमत्व – बाबासाहेब पुरंदरे

News Desk