HW News Marathi
महाराष्ट्र

भाजपने एकही जागा न दिल्याने रामदास आठवलेंनी व्यक्त केली नाराजी

मुंबई | आज (८ मे) २१ मेला होणाऱ्या विधान परिषदेच्या ९ जागांसाठी होणाऱ्या निवडणुकीत भाजपच्या वाट्याला येणाऱ्या चार जागांपैकी एक जागा रिपब्लिकन पक्षाला द्यावी अशी मागणी रिपाईचे अध्यक्ष रामदास आठवले यांनी केली होती. मात्र, आज जाहीर केलेल्या उमेदवारांपैकी एकही जागा रिपब्लिकन पक्षाला न दिल्याने राज्यभरातील रिपब्लिकन कार्यकर्ते नाराज असल्याची प्रतिक्रिया रिपाइंचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी व्यक्त केली आहे.
गेली अनेक वर्ष रिपब्लिकन पक्ष ताकदीने भाजप सोबत असून मित्र पक्ष म्हणून कायम भाजपला रिपाइंने खंबीर साथ दिली आहे. मागील ८ वर्षांत भाजपने रिपब्लिकन पक्षाला राज्यात एक ही विधान परिषदेची जागा दिली नाही. त्यामुळे येत्या २१ मेला विधान परिषदेच्या ९ जागांसाठी होत असलेल्या निवडणुकीत रिपाईला भाजपने १ जागा देणे अपेक्षित होते. विधान परिषदेची एक ही जागा न दिल्याने भाजपवर रिपब्लिकन पक्ष नाराज असल्याचे रामदास आठवले ट्विट करत नाराजी व्यक्त केली आहे.
Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

कल्याण-डोंबिवलीचे सर्व प्रवेशद्वार बंद करण्याचे महानगरपालिकाच्या आयुक्तांचे आदेश

News Desk

महत्वाच्या कामांसाठी परदेशी जाणाऱ्या नागरिकांकरिता प्रिकॉशन डोसच्या कालावधीत घट

News Desk

खासदार प्रीतम मुंडेंच्या रॅलीला गोपीनाथ गडावरुन सुरुवात….

News Desk