HW News Marathi
महाराष्ट्र

“सरकार खुद गीर जायेगी, महाविकास आघाडी हार जायेगी”, आठवलेंचा इशारा

मुंबई | मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी काल दसरा मेळाव्याच्या भाषणात विरोधकांना चोख प्रत्युत्तर दिले आहे. गेले अनेक दिवस भाजप सरकार पडेल असे म्हणत आहे यावर तुम्ही सरकार पाडून दाखवाच असे आव्हानच मुख्यमंत्र्यांनी विरोधकांवर केले आहे. यावर केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी प्रतिक्रिया दिली आहे. “सरकार आम्ही पाडणार नाही पण हे सरकार कधी पडणार हे उद्धव ठाकरे यांना कळणारही नाही”, असा टोला केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी लगावला आहे.

सरकार पडलं तर अराजकता पसरेल असे विधान मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दसरा मेळाव्यात केले होते. या मताशी मी सहमत नसल्याचे आठवले म्हणाले.भाजप शिवसेना २५-३० वर्ष एकत्र हिंदुत्वावर होते. संघाकडून हिंदुत्व शिकण्याची गरज नाही संघात सगळे तयार झाले आहेत असे आठवले म्हणाले. भाजपवर टीका करताना शिवसेनेचे हिंदुत्व वेगळे कसे ? असा प्रश्न देखील त्यांनी उपस्थित केला आहे.

जीएसटी कायदा रद्द करण्याची गरज नाही. यात नवीन काही करण्याची गरज नाही. जीएसटी पैसा मिळाला पाहिजे या उद्धव ठाकरे यांच्या मताशी सहमत असून त्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे आठवले म्हणाले. सरकार पडेल इतिहास घडेल. महाविकास आघाडी सरकार आम्ही पाडणार नाही. हे सरकार स्वतः पडणार असे ते म्हणाले. सरकार खुद गीर जायेगी, महाविकास आघाडी हार जायेगी अशा शब्दात त्यांनी हे स्पष्टीकरण केलं. काँग्रेस-राष्ट्रवादीच्या आमदारांमध्ये नाराजी आहे. त्यामुळे एक दिवस भूकंप होणार असल्याचा इशारा आठवलेंनी दिला आहे.

तसेच, मुंबई पाकव्याप्त काश्मीरच्या मुद्द्यावर मी कंगनाला पाठींबा दिला नसल्याचं आठवलेंनी पुन्हा स्पष्ट केलंय. मुंबईत तिला येऊ देणार नाहीत या मुद्दयावर मी तिला पाठींबा दिला होता. बाळासाहेब असते तर कंगना त्यांना भेटली असती तातबडतोब हा विषय मिटला असता. त्यामुळे कंगनाच्या संदर्भात उद्धव ठाकरे सकारात्मक भुमिका घेऊन विषय संपवावा असे आठवलेंनी म्हटले आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

‘वैद्यकीय महाविद्यालय उभारणीसाठी शासकीय आणि खासगी भागिदारी धोरणाला मंजुरी’ -अमित देशमुख

News Desk

मुख्यमंत्र्यांच्या पाठपुराव्याला यश, राज्यात रेमडीसीव्हीरचा पुरवठा वाढला, मुख्यमंत्र्यांकडून पंतप्रधानांचे आभार

News Desk

फडणवीस सरकारची अंध व्यक्तींवर मुजोरी

News Desk