HW News Marathi
महाराष्ट्र

राहुल गांधींनी दलित मुलीशी लग्न करावं… आठवलेंचा राहुल गांधींना सल्ला

मुंबई | काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी लोकसभेत सरकारच्या ‘हम दो हमारे दो’ धोरणावरून टीका केली होती. “हम दो, हमारे दो’चे हे सरकार आहे”, अशा शब्दात त्यांनी मोदी सरकारवर निशाणा साधला होता. राहुल गांधींच्या ‘हम दो, हमारे दो’च्या वक्तव्यावर आता केंद्रीय मंत्री आणि रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे नेते रामदास आठवले यांनी त्यांना एक सल्ला दिला आहे.

“हम दो, हमारे दो” च्या घोषणेचा वापर पूर्वी कुटुंब नियोजनासाठी केला जात होता. जर त्यांना (राहुल गांधींना) या घोषणेचा प्रचार करायचा असेल तर त्यांनी आधी लग्न करायला हवं…आणि लग्न करायचं असेल तर त्यांनी दलित मुलीशी करावं आणि महात्मा गांधींचं जातीयवाद हटवण्याचं स्वप्न पूर्ण करावं. त्यांच्या या कृतीतून तरुणांना प्रेरणा मिळेल”, असं रामदास आठवले म्हणाले आहेत.

 

काय म्हणाले होते राहुल गांधी?

संसदेत ११ फेब्रुवारी रोजी भाषण करताना ‘एकेकाळी हम दो, हमारे दो ‘चा नारा दिला जायचा, असं म्हणत राहुल गांधींनी “हा देश फक्त चार जण चालवत आहेत. म्हणजेच ‘हम दो, हमारे दो’ हे सरकार चालवत आहेत. त्यांची नावं घेणार नाही. पण ते लोक कोण आहेत, हे सर्वांना माहिती आहे”, अशी टीका केली होती

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

ग्रामपंचायत निवडणुकीचे निकाल ऐकताना पाय जमिनीवर आहेत असं वाटतं, मनसेची प्रतिक्रिया 

News Desk

लोकमान्य टिळक आणि लोकशाहीर अण्णाभाऊंच्या जन्मशताब्दीनिमित्त उपमुख्यमंत्र्यांकडून अभिवादन !

News Desk

‘ए भाई’ अमृता फडणवीस मुंबई काँग्रेस अध्यक्ष भाई जगतापांवर का भडकल्या ?

News Desk