HW News Marathi
महाराष्ट्र

सर्व धर्मीय प्रार्थनास्थळे खुली करा, रामदास आठवलेंचे मुख्यमंत्र्यांना पत्र

मुंबई | कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी खबरदारीचा उपाय म्हणून लोकडाऊन करण्यात आले. त्यात सर्वधर्मीय प्रार्थनास्थळे भाविकांसाठी बंद करण्यात आली आता कोरोना पासून बचाव करण्याचे खबरदारी घेण्याचे जनतेचे प्रबोधन झाले असून कोरोना च्या प्रादुर्भावावर नियंत्रण मिळविले जात असल्यामुळे टप्प्याटप्प्याने अनलॉक केले जात आहे. त्यात आता भाविकांसाठी मंदिर, मस्जिद,चर्च, गुरुद्वारा, बुद्धविहार, देरासर खुली करावीत अशी मागणी रिपब्लिकन पक्षाचे अध्यक्ष केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी केली आहे. या मागणीचे पत्र त्यांनी महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पाठवले आहे.
मुस्लिम समाजाच्यावतीने रिपाइंचे अल्पसंख्यांक आघाडी मुंबई अध्यक्ष हसन शेख आणि अनिस पठाण यांच्या नेतृत्वात भेटलेल्या शिष्टमंडळाने रामदास आठवले यांना निवेदन देऊन मस्जिद सुरू करण्याची मागणी केली. नुकतेच मुंबई उच्च न्यायालयाने जैन धर्मियांना आठवड्यातून दोन दिवस देरासर सुरू करण्याची परवानगी दिली असल्याची माहिती रिपाइं अल्पसंख्यांक आघाडीच्या शिष्टमंडळाने रामदास आठवले यांना दिली. सर्व प्रार्थनास्थळे सुरू करण्याबाबत राज्यपाल आणि मुख्यमंत्री यांना पत्र पाठवत असल्याचे रामदास आठवले यांनी आश्वासन दिले. सर्व प्रार्थनास्थळे मास्क, सॅनिटायझर आणि फिजिकल डिस्टन्सचे नियम पाळून सर्व धर्मीयांची प्रार्थनास्थळे सुरू करावीत अशी मागणी रामदास आठवले यांनी केली आहे.
Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

धक्कादायक! राज्यातील काही नेत्यांना वीज बिल आलेच नाही

News Desk

अंबानींच्या घराबाहेरील स्फोटकं प्रकरणी फडणवीसांचे ‘हे’ गंभीर आरोप

News Desk

राज्य सरकारकडून अनलॉक-६ च्या गाईडलाईन्स जारी

News Desk