HW News Marathi
Covid-19

मोदींच्या ‘या’ निर्णयामुळे महाविकास आघाडीचे तोंड बंद झाले, आठवलेंचा टोला

मुंबई | पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 21 जूनपासून 18 वर्षांवरील सर्वांना कोरोना प्रतिबंधक लस मोफत देण्याचा आणि पंतप्रधान गरीब कल्याण अन्न योजनेतून देशभरातील 80 कोटी नागरिकांना येत्या दिवाळीपर्यंत प्रत्येकी 5 किलो अन्नधान्य मोफत देण्याचा निर्णय घेतला आहे. पंतप्रधानांचा हा निर्णय स्वागतार्ह आहे, असे मत रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी व्यक्त केले आहे. तसेच पंतप्रधानांचा आदर्श घेऊन महाविकास आघाडीनेही राज्यातील गरिबांना भरघोस मदत करावी, असे आवाहनही आठवले यांनी केले आहे.

यापूर्वी मे-जून महिन्यात पी. एम. गरीब कल्याण अन्न योजनेतून अन्नधान्य गरिबांना देण्याचा निर्णय घेण्यात आला होता. आता जून महिन्याच्या पुढे दिवाळीपर्यंत या योजनेचा विस्तार केल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या गरीब कल्याण दृष्टीचे आम्ही मनःपूर्वक अभिनंदन करीत आहोत, असे रामदास आठवले यांनी म्हटले आहे. महाराष्ट्रातील महाविकास आघाडी सरकार केंद्र सरकारवर सतत टीका करीत होते, मात्र मोफत लस देण्याचा आणि गरिबांना अन्नधान्य वाटपाचा निर्णय पंतप्रधानांनी घेतला असल्यामुळे महाविकास आघाडीचे तोंड बंद झाले आहे, असा टोला आठवले यांनी लगावला आहे.

महाविकास आघाडीने पंतप्रधानांचा आदर्श घ्यावा

महाराष्ट्रात मात्र शिवभोजन योजनेव्यतिरिक्त गरीब गरजूंना कोणतीही मदत अद्याप राज्य शासनाद्वारे मिळालेली नाही. राज्यातील कलावंत, शाहीर, गायक, तमाशा कलावंत हालअपेष्टा काढत आहेत. त्यांना राज्य सरकारने तातडीने आर्थिक मदत केली पाहिजे. मागील वर्षाभरापासून राज्य शासनाने कोरोनाच्या संकटकाळात लॉकडाऊनच्या बिकट दिवसांत गरिबांना कोणतीही आर्थिक मदत दिली नाही. राज्यातील गरीब गरजूंना राज्य सरकारने त्वरित आर्थिक मदत दिली पाहिजे. महाविकास आघाडी सरकारने पंतप्रधान नरेंद्र मोदींचा आदर्श घेऊन राज्यातील गरिबांना भरीव मदतीचे त्वरित वाटप करावे, असे आवाहन आठवले यांनी केले आहे.

आठवलेंकडून मोदींचे कौतुक

देशात कोरोनाचा प्रसार वाढत आहे. महाराष्ट्रात तर मोठया प्रमाणात कोरोनाचा कहर वाढला आहे. महाराष्ट्राप्रमाणे अन्य राज्यात कडक निर्बंध लागले आहेत. लॉकडाऊन लावण्यात आला आहे. त्यामुळे हातावर पोट असणाऱ्या गरिबांना मोलमजुरी मिळत नाही. रोजगार बुडाला आहे. त्यामुळे गरिबांच्या उदरनिर्वाहाचा मोठा प्रश्न आहे. गरिबांचे हे दुःख ओळखून पंतप्रधान नरेंद्र मोदींनी गरीब कल्याण अन्नयोजनेद्वारे देशभरातील 80 कोटी गरिबांना दिवाळीपर्यंत प्रत्येकी 5 किलो अन्नधान्य मोफत देण्याचा घेतलेला निर्णय अत्यंत योग्य आणि गरिबांप्रती त्यांची कटीबद्धता दाखवणारा निर्णय आहे, अशा शब्दात आठवले यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या या निर्णयाचे स्वागत केले आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

अशोक चव्हाण यांच्यावर पुढील उपचार मुंबईत होणार

News Desk

शरद पवार आणि परराष्ट्र मंत्रालयाच्या मदतीने इराणमध्ये अडकलेले भारतीय मायदेशी सुखरूप परतले..

Arati More

अदर पुनावाला डाकू ! भाजप आमदाराची मुक्ताफळे

News Desk