HW News Marathi
महाराष्ट्र

रत्नागिरीत १९ पैकी १४ जण कोरोना निगेटिव्ह तर ५ जण स्वाईन फ्लू पॉझिटिव्ह

रत्नागिरी | कोरोनामुळे शहरात जितकी काळजी घेतली जात हे तितकीच काळजी गावीही घेतली जात आहे. रत्नागिरीत आत्तापर्यंत १९ जणांना कोरोना चाचणी करण्यात आली. परंतू, या चाचणीत त्यांना कोरोना नसून यातील ५ जणांना स्वाईन फ्लूची लागण झाल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. एकीकडे कोरोनाच्या संशयितांवर कडी नजर ठेवली जात आहे. ज्यांनी काही दिवसांआधी भारताबाहेरुन प्रवास करुन गावात आले आहेत त्यांना प्राधान्याने तपासले जात आहे. इतकेच नव्हे तर त्यांना होम क्वॉरंटाईन करण्यात येत आहे.

रत्नागिरीतील खेड तालुक्यात परदेशाहून प्रवास केलेली व्यक्ती अनेकांच्या संपर्कात आल्याने एकच खळबळ उडाली होती. या व्यक्तीसोबत संपर्कात आलेल्या लोकांचे रिपोर्ट देखील तपासणीसाठी पाठवण्यात आले होते. दरम्यान, काल (२९ मार्च) संध्याकाळी हे रिपोर्ट प्राप्त झाले असून १९ जणांना कोरोना नसल्याचे स्पष्ट झाले आहे. या १९ जणांपैकी ५ जणांना स्वाईन फ्लुची लागण झाली असून, यामध्ये ३ महिला आणि २ पुरूषांचा समावेश आहे. या पाचही जणांवर रुग्णालयात उपचार सुरु आहेत.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.
Some error occurred

Related posts

नवाब मलिक यांची मंत्रिमंडळातून हकालपट्टी करा, चंद्रकांत पाटलांची राज्यपालांकडे मागणी

News Desk

राज्यपालांच्या वाक्यावरुन वाद घालण्याची ही वेळ आहे का? आधी शेतकऱ्यांकडे लक्ष द्या –  देवेंद्र फडणवीस

News Desk

‘शिवभोजना’साठी आधारकार्ड सक्ती नाही, छगन भुजबळांनी दिली माहिती

swarit