HW News Marathi
देश / विदेश

गणेशोत्सवासाठी कोकणात जाण्यास आणखी ४० स्पेशल गाड्या, रावसाहेब दानवेंनी माहिती

नवी दिल्ली | केंद्रीय रेल्वे मंत्री रावसाहेब दानवेंनी कोकणात गणेशोत्सवासाठी ७२ गाड्या सोडण्याचा निर्णय घेतला होता. कोकणातील पूर परिस्थितीतून मार्ग काढून रेल्वे लवकरात लवकर सुरु कशी करता येईल जेणेकरून मदत कार्याला वेग येण्यास मदत होईल. याबाबत तातडीने आढावा घेऊन रेल्वे अधिकाऱ्यांना सूचना करतानाच गणेशोत्सवासाठी अजून ४० गाड्यांचे नियोजन करण्याच्या सूचना रेल्वे राज्य मंत्री रावसाहेब दानवे यांनी आज केल्या आहेत.

आशिष शेलारांनी दिली माहिती

भाजप आमदार आशिष शेलार यांनी रावसाहेब दानवे अतिरिक्त गाड्या सोडण्याचा निर्णय ट्विट केला आहे. भाजपचे नेते आशिष शेलार यांनी दानवे यांची नुकतीच भेट घेऊन गणेशोत्सवात कोकणासाठी अधिकच्या गाड्या सोडण्याचा विनंती केली होती. त्यानंतर हा निर्णय घेण्यात आला आहे. त्यामुळे कोकणात जाण्यासाठी अधिकच्या ४० फेऱ्या सोडण्यात येणार असल्याची घोषणा केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी केली आहे.

कोकणात जाण्यासाठी ७२ स्पेशल गाड्या

कोकणात चाकरमान्यांना जात यावं म्हणून केंद्रीय रेल्वे मंत्री रावसाहेब दानवे यांनी एक मोठं निर्णय घेतला आहे. गणेशोत्सावात कोकणात जाण्यासाठी ७२ स्पेशल गाड्या सोडण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला आहे. तशी घोषणाच नवे केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी केली आहे. गणेश उत्सवासाठी मुंबईतून आपआपल्या गावी जाणाऱ्या कोकणवासियांची प्रवासादरम्यान कुठल्याही प्रकारची गैरसोय होऊ नये यासाठी रेल्वे मंत्रालयाने हा निर्णय घेतला आहे. गणेशोत्सव काळात CSMT- सावंतवाडी रोड डेली स्पेशल या गाडीच्या एकूण ३६ ट्रिप होतील. तसेच CSMT- रत्नागिरी बाय विकली स्पेशल या गाडीच्या १० ट्रिप होणार आहेत. पनवेल- सावंतवाडी रोड ट्राय विकली स्पेशल या गाडीच्या १६ ट्रीप होतील आणि पनवेल रत्नागिरी बाय विकली स्पेशल या गाडीच्या एकूण १० ट्रीप होणार आहेत, असे रावसाहेब दानवे यांनी सांगितलं आहे.

कश्या सोडल्या जातील गाड्या

कोकणात गणेशोत्सवासाठी जाणाऱ्या चाकरमान्यांना सोडण्यात आलेल्या ७२ विशेष रेल्वे गाड्या फुल झाल्या असून रेल्वेने अजून अधिकच्या गाड्या सोडाव्यात, अशी मागणी शेलार यांनी केली आहे. दरवर्षीच्या तुलनेत या गाड्या कमी असून २०१९ ला कोकण रेल्वेवर २१० फेऱ्या व रेल्वे गाड्यांना ६४७ अतिरिक्त डबेही जोडले होते. तर त्यावेळी तिकीटांसाठी ज्यादा बुकिंग साठी ११ टपाल खात्यात, १७ रेल्वे स्थानकात पीआरएस सिस्टम आणि १६ ठिकाणी टाऊन बुकिंग एजन्सी आदी सुविधा २०१९ ला खास कोकणवासीयांना उपलब्ध करुन दिल्या होत्या. त्यामुळे याही वर्षी अशा अधिकच्या बुकिंग सुविधा व अजूनच्या काही गाड्या कोकणातील चाकरमान्यांना उपलब्ध करुन देण्याबाबत कोकण रेल्वेला निर्देश द्यावेत, अशी मागणीही त्यांनी केली आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

वैद्यकीय शिक्षण मंत्र्यांसह मुंबई-पुण्याहून ८१ डॉक्टरांची टीम केरळला रवाना

swarit

‘कर्जबाजारी’ सरकारी कंपन्या विकून ‘दात कोरून पोट भरण्याचे उद्योग’ करायचे !

News Desk

बिहार निवडणूकीत कोरोना रुग्णांनाही करता येणार मतदान!

News Desk