HW News Marathi
Covid-19

ग्रामपंचायतीवर राजकीय पक्ष्याचा कार्यकर्ता नेमणे म्हणजे लोकशाहीचा खून- आ. सुरेश धस

बीड | महाराष्ट्र सरकारने नुकताच एक जीआर जारी केला आहे.ज्यानुसार ग्रामपंचायतींवर प्रशासकाची नेमणूक केली जाणार आहे. महाराष्ट्र सरकारचा हा जीआर लोकशाहीचा खून करणारा असल्याचे वक्तव्य भाजपचे आमदार सुरेश धस यांनी केले आहे.

आमदार सुरेश धस म्हणले की, ग्रामपंचायतीवर सरकारी अधिकारी न नेमता पक्ष्याच्या वतीने मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी पालकमंत्र्याची सहमती घेऊन संबंधित राजकीय कार्यकर्ता नेमणे हे चुकीचे आहे. जो जीआर सध्याच्या सरकारने काढलेला आहे त्याचा विरोध महाराष्ट्रातील संबंध ग्रामीण भागातील जनतेत होत आहे. या पूर्वीही सरकारने जनतेतील निवडीचा सरपंच बंद करण्याचा घेतलेला निर्णय आणि आत्ताचा ग्रामपंचायतींवरती प्रशासकाचा घेतलेला निर्णय हा लोकशाहीचा गळा घोटणारा आहे. हा जीआर सरकारने परत घ्यावा अशी विनंती आमदार सुरेश धस यांनी केली आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

कोरोनामुळे पालक गमावलेल्या बालकांचं पालकत्व राज्य सरकार स्विकारणार – मुख्यमंत्री

News Desk

उपमुख्यमंत्री अजित पवार यांना कोरोनाची लागण

News Desk

दिलासादायक : कल्याण-डोंबिवलीत एका दिवसात ५१ जण कोरोनामुक्त

News Desk