HW News Marathi
महाराष्ट्र

मुंबईतील निर्बंधात शिथिलता; पहा काय आहेत नवे नियम

मुंबई | गेल्या काही दिवसांत कोरोना आणि त्याचा नवा व्हेरियंट ओमायक्रॉनमुळे राज्यातील रुग्णसंख्या पुन्हा वाढू लागली होती. त्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने पुन्हा एकदा शिथिल केलेले निर्बंध कडक केले होते. मात्र, आता मुंबईसह महाराष्ट्रातील कोरोना संख्या हळूहळू कमी होताना दिसत आहे. त्यामुळे कोरोनाची तिसरी लाट ओसरत असल्याचं सांगण्यात येत आहे. यामुळेच सरकारने मुंबईतील निर्बंध शिथिल करण्याचा निर्णय घेतला आहे.

राज्य सरकारने नवी नियमावली लागू केली असून मुंबईतील रात्रीची संचारबंदी हटवण्यात आली आहे. आज १ फेब्रुवारीपासूनच हा नियम लागू होणार आहे. त्याचबरोबर मुंबईतील चौपाट्या, उद्याने, पार्क देखील खुले करण्यात येणार आहेत. शिवाय लग्न समारंभ व इतर सांस्कृतिक कार्यक्रमांस २०० लोकांची उपस्थिती देण्यात आली आहे. तसेच स्विमिंग पूल, वॉटर पार्क व थीम पार्क ५० टक्के उपस्थितीने सुरू करण्यास मान्यता देण्यात आली आहे.

काय आहेत नवे नियम?

◆ मुंबईत रात्रीची संचारबंदी उठवली

◆ मुंबईतली सर्व पर्यटनस्थळं सुरु होणार

◆ स्पा आणि सलून ५० टक्के क्षमतेने सुरू राहतील

◆ चौपाट्या, पर्यटनस्थळे, उद्यान, पार्क सुरू होणार

◆ स्विमिंग पूल, वॉटरपार्क ५० टक्के क्षमतेने सुरू

◆ रेस्टॉरंट, थेटर्स, नाट्यगृहे ५० टक्के मर्यादेने सुरू

◆ धार्मिक आणि करमणुकीच्या कार्यक्रमांना ५० टक्के उपस्थितीची परवानगी

◆ अंत्यसंस्काराला उपस्थितीची मर्यादा नाही

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

अफगाणिस्तानबाबत भारताची भूमिका काय? SCO बैठकीत पंतप्रधान मोदींनी केलं स्पष्ट!

News Desk

डाळींवरील साठवणुक मर्यादा हटवणार – रामविलास पासवान

News Desk

शिवसेनेचा मंत्री फडणवीसांना भेटायला तडफडत होता, निलेश राणेंच्या दाव्यावर उदय सामंत म्हणतात…

News Desk