HW News Marathi
देश / विदेश

२०२०च्या वर्षात नोकऱ्यांची संख्येला आर्थिक मंदीचा झटका

मुंबई: आपल्या उदरनिर्वाहासाठी सगळ्यात महत्त्वाचे असते ते म्हणजे आर्थिक पाठबळ पण सध्या आर्थिक मंदीने देशभरातील रोजगारावर आणि रोजगाराच्या निर्मीतीवर खुप परिणाम होत असल्याची माहिती एसबीआय रिसर्च रिपोर्ट इकोरॅपच्या अहवालातून समोर आली आहे.२०१९च्या आर्थिक वर्षाच्या तुलनेत २०२० हे वर्ष सुरु होऊनही या वर्षात नोकऱ्यांची निर्मिती ही मागील वर्षाच्या तुलनेत कमी झाली आहे. २०२०च्या आर्थिक वर्षात जवळपास १६ लाख नोकऱ्या कमी झाल्या आहेत.

मागील वर्षी एकूण ८९.७ लाख नोकऱ्यांची निर्मिती झाली होती. पण या वर्षी नोकऱ्यांच्या संख्येत कमालीची घट होणार आहे. एसबीआय रिसर्च रिपोर्ट इकोरॅपच्या अहवालानुसार आसाम, बिहार, राजस्थान, उत्तर प्रदेश, ओडिशा आदी राज्यांमधील नागरीक नोकरीच्या निमित्ताने आपापले राज्य सोडून दुसऱ्या राज्यात किंवा देशात नोकरीच्या शोधात जात आहेत. तसेच ते घरी पाठवत असलेल्या रकमेतही प्रचंड प्रमाणात घट झालेली दिसून आली आहे.

भविष्य निर्वाह निधी संघटना (इपीएफओ)ने दिलेल्या आकडेवारीनुसार मागील आर्थिक वर्ष २०१८-१९ मध्ये ८९.७ लाख नवे रोजगार निर्माण झाले होते. मागील आर्थिक वर्षात ज्यांना रोजगार मिळाले त्यांचे अधिकाधिक मासिक उत्पन्न १५ हजार रुपयांच्या घरात होते.सगळ्यात जास्त रोजगाराच्या संधी उपलब्ध करुन देणारी राज्य म्हणजे महाराष्ट्र, गुजरात, पंजाब. याच राज्यांमध्ये नोकरीची घटणारी आवाक पाहता २०२०या वर्षात महागाईने तर उच्चांक गाठला होताच पण आत्ता नोकरीच्या संध्याचं उपलब्ध नसल्याकारणाने जनतेला आणखी कोण कोणत्या संकंटांना सामोरे जावे लागणार आहे याची फक्त कल्पनाच करायला हवी.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

“कोरोना काळात नर्स डॉक्टरच्या रुपात देव आला होता”, लोकसभेत मोदींचे वक्तव्य

News Desk

कर्नाटकातील आमदारांचा गोव्याला जाण्याचा प्लॅन रद्द

News Desk

आता अ‍ॅमेझोनही देणार यूपीआय सुविधा

News Desk