HW News Marathi
महाराष्ट्र

भाजपचे सरकार असताना अशाच प्रकारे अहवाल तयार होत होते का? रोहित पवारांचा सवाल

मुंबई | गेल्या काही दिवसांपासून अनेक प्रकरणांवरून महाविकास आघाडी सरकार आणि भाजपसह अन्य पक्षांमध्ये आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झडताना दिसत आहेत. मुख्य सचिव सीताराम कुंटे यांनी फोन टॅपिंग प्रकरणातील अहवाल मुख्यमंत्र्यांना सादर केला. मात्र, हा अहवाल कुंटे यांनी तयार केलाच नसावा, असे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले होते. तसेच ते असं म्हणाले होते की, “हा अहवाल जितेंद्र आव्हाड आणि नवाब मलिक यांनी लिहिला असेल कुंटे यांनी सही केली असेल”. यावर आता राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांनी अप्रत्यक्षरित्या फडणवीस यांना टोला लगावला आहे.

सरकारला बदनाम करण्यासाठीच ‘फोन टॅपिंग’चं षडयंत्र मुख्य सचिवांच्या अहवालातील अनेक बाबी धक्कादायक आहेत. मविआ सरकारला बदनाम करण्यासाठीच ‘फोन टॅपिंग’चं षडयंत्र रचण्यात आलं काय, अशी शंका या अहवालावरून येतेय. तसंच अधिकाऱ्यांच्या खांद्यावर बंदूक ठेवून राजकीय गोळ्या झाडण्याची अशी प्रथा पडली तर भविष्यात प्रशासनाला काम करणंही अवघड होईल, असे रोहित पवार यांनी आपल्या दुसऱ्या ट्विटमध्ये म्हटले आहे.

अहवाल मी नव्हे तर नवाब मलिक यांनी फोडला – फडणवीस

राज्यातील पोलीस बदल्यांमध्ये भ्रष्टाचार झाल्याचा अहवाल हा मी फोडला नाही. मी या अहवालाचं केवळ कव्हरिंग लेटर वाचलं होतं. मात्र, राष्ट्रवादी काँग्रेसचे मंत्री नवाब मलिक यांनी तो अहवाल प्रसारमाध्यमांना उपलब्ध करुन दिला. आता हेच नेते अहवाल फुटल्यामुळे काही अधिकाऱ्यांना मानसिक त्रास होत असल्याचे म्हणत आहेत. पण मी कव्हरिंग लेटर वगळता उर्वरित अहवाल लिफाफाबंद करुन केंद्रीय गृहसचिवांना सादर केला होता. याउलट नवाब मलिक यांनी या अहवालाची काही पाने प्रसारमाध्यमांना दिली. त्यामुळे तो अहवाल नवाब मलिक यांनीच फोडला आहे, असे देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

मुख्यमंत्र्यांचे हस्ते २७ जुलैला बीडीडी चाळींच्या पुनर्विकासाचे होणार भूमिपूजन

News Desk

राज्यपालांच्या हस्ते ९७ पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांना राष्ट्रपती पोलीस पदके प्रदान

Aprna

धनंजय मुंडेंच्या ‘त्या’ साखर कारखान्याच्या जमीन गैरव्यहार प्रकरणी सोमय्यांचे गंभीर आरोप

News Desk