HW News Marathi
महाराष्ट्र

“वानखेडेंची नोकरी जाणार की मलिकांचं मंत्रिपद? पाहुयात”, आठवलेंचा सूचक इशारा 

मुंबई । केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री आणि आरपीआयचे अध्यक्ष रामदास आठवले यांनी महाविकासआघाडी आणि राष्ट्रवादीसाठी एक अत्यंत सूचक विधान केलं आहे. गेल्या काही दिवसांपासून राज्यात राष्ट्रवादी विरुद्ध एनसीबी असं चित्र आणि टोकाचा वाद पाहायला मिळत आहे. याच पार्श्वभूमीवर, एनसीबीचे अधिकारी समीर वानखेडे यांची एक वर्षात नोकरी घालवणार असल्याचं विधान राष्ट्रवादीचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी केलं होतं. त्यावर आता रामदास आठवले यांनी एनसीबीची पाठराखण केली आहे. “वानखेडेंची नोकरी जाते की नवाब मलिक यांचं मंत्रिपद? ते पाहुयात”, असा खोचक टोला यावेळी आठवले यांनी लगावला आहे.

आज आपल्या कराड दौऱ्यात मीडियाशी संवाद साधताना रामदास आठवले म्हणाले की, “संपूर्ण प्रकरणात समीर वानखेडेंची नोकरी जातेय की नवाब मलिक यांचं मंत्रीपद ते पाहुया. त्याचप्रमाणे, आर्यन खान प्रकरणात पक्षपातीपणा केला जातोय असं म्हणता येणार नाही. पूर्ण चौकशी केल्यानंतरच आर्यन खानसह इतरांना ताब्यात घेण्यात आलं आहे. जामीन फेटाळला याचाच अर्थ असा की त्याच्या विरोधात सबळ पुरावे आहेत. सुशांत सिंग प्रकरणानंतर फिल्म इंडस्ट्रीमध्ये मोठ्या प्रमाणात ड्रग्जचा पुरवठा होतोय हे सिध्द झालं आहे. त्यामुळे पक्षपातीपणाचा आरोप योग्य ठरणार नाही”, असं रामदास आठवले यावेळी म्हणाले.

‘मनसे’ला खुली ऑफर

मनसे-भाजप युतीवर बोलताना रामदास आठवलेंनी मनसेला थेट खुली ऑफर दिली आहे. रामदास आठवले म्हणाले की, “मुंबई महानगरपालिका निवडणुकीत भाजपने मनसेशी युती केली तरी सत्ता येऊ शकणार नाही. त्यापेक्षा, आमच्याशी युती केली तर मनसेचा महापौर आणि आमचा उपमहापौर होऊ शकतो.”

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

एसटी कामगारांनी सातवा वेतन आयोग विसरा

News Desk

भाजप आणि संघाकडे इतिहासही नाही आणि भविष्यही!

News Desk

शरद पवारांच्या भेटीसाठी राज ठाकरे रवाना, ST कर्मचाऱ्यांच्या मुद्द्यावर होणार चर्चा

News Desk