HW News Marathi
महाराष्ट्र

गणेशोत्सवाला जाताना चाकरमान्यांना पाळावे लागणार काही नियम, जाणून घ्या कोणते?

मुंबई | कोरोनाच्या पार्श्वभूमीवर यंदा सगळ्याच गणेशोत्सवावर संकट आले आहे. हा सण कोकणात अतिशय उत्साहाने आणि आनंदाने साजरा केला जातो. प्रत्येक चाकरमानी वर्षातून एकदातरी कोकणात गणेशोत्सवासाठी जात असतो. कोकणातील गणेशोत्सवावर यंदा कोरोनाचे सावट आहे. चाकरमान्यांना कोकणात जायचे असेल तर त्यांना काही नियम अटी पाळाव्या लागणार आहे. यंदाचा गणेशोत्सव मुंबईत अतिशय साधेपद्धतीने करण्याचा निर्णय सरकारने केला आहे. त्याला गणेश मंडळांनी देखील पाठिंबा दिला आहे.

याआधी, सिंधुदुर्ग जिल्ह्यात मुंबईकरांना गणेशोत्सवासाठी प्रवेश दिला जाणार आहे, याबात एक पत्रक देखील जारी केले होते. मात्र, याबाबत अधिक माहिती सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री उदय सामंत यांनी स्पष्टीकरण दिले आहे. सिंंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री उदय सामंत यांनी शासनाची भूमिका स्पष्ट केली आहे. यांच्या अध्यक्षतेखाली काल शांतता समितीची बैठक पार पडली आहे. गणेशोत्सवासाठी कोकणात येणाऱ्या चाकरमान्यांना विलगीकरण कक्षात (कॉरटाइन ) चौदा दिवस ठेवण्यापेक्षा सात दिवस ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. त्यांना कोकणात गणेशोत्सवासाठी येताना टोल माफ सुविधा देण्यात येणार आहे. त्यांची कोविड-19 ची तपासणी करणे आणि त्याचा खर्च शासनाने करावा अशा विविध विषयांवर शुक्रवार बैठकीत चर्चा करण्यात आली.

गणेशोत्सावासाठी चाकरमान्यांना ‘हे’ नियम लागू होणार आहेत.

*चाकरमान्यांना गावी गेल्यावर ७ दिवस क्वारंटाईन रहावे लागणार आहे.

* कोणत्याही अफवांवर विश्वास ठेऊ नये, त्यांच्या आरोग्याची काळजी घेण्यास प्रशासन कटिबद्ध आहे.

* पासेसची व्यवस्था आणि प्रवासाचे नियोजन करणे

* कोकणात गणेशोत्सवासाठी येताना टोल माफ सुविधा देण्यात येणार आहे.

* कोविड-19 ची तपासणी करणे आणि त्याचा खर्च शासनाने करावा.

कोकणात येणाऱ्या सर्व चाकरमान्यांची विशेष काळजी घेण्यात येईल.

चाकरमान्यांनी गणपतीला आलेच पाहिजे, हीच आमची भूमिका आहे.

त्यांना कोकणात येण्यास विरोध नाही त्यामुळे कोणत्याही अफवांवर विश्वास ठेऊ नये.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

“तुम्ही राणे साहेबांचा खून करणार आहेत”, प्रसाद लाड यांचा गंभीर आरोप

News Desk

‘अंजली दमानिया यांनी खुशाल हायकोर्टात जावं’ – छगन भुजबळ

News Desk

“आधी सोबतच्यांना शिकवा, मग आम्हाला सांगा”, फडणवीसांचा ठाकरेंवर हल्ला

News Desk