HW News Marathi
महाराष्ट्र

“आमदारकीसाठी बारामतीला जाऊन आमरस अन् गोड चहा घेणं सोडा” – सदाभाऊ खोत

ठाणे | केंद्राच्या कृषी कायद्याला शेतकरी विरोध करत आहेत. तर महाराष्ट्रातूनसुद्धा विरोध केला जात आहे. यामध्ये शेतकरी स्वाभीमानी संघटेनेचे नेते राजु शेट्टी यांनीही कृषी कायद्यांवरून केंद्रावर जोरदार टीका केली होती. याच पार्श्वभूमीवर रयत क्रांती संघटनेचे नेते सदाभाऊ खोत यांनी शेट्टींवर निशाणा साधला.

केंद्र सरकारने लागू केलेल्या कायद्याच्या समर्थनार्थ सदाभाऊ खोत यांनी ठाण्यात पत्रकार परिषदेचे आयोजन केले होते. त्यावेळी माध्यमांशी बोलताना खोत यांनी शेतकरी नेते राजू शेट्टींवर जोरदार टीका केली आहे.

लोकशाहीमध्ये आंदोलन करण्याचा अधिकार प्रत्येकाला आहे. मात्र शेतकऱ्यासाठी आम्ही काम करतो असे खोट बोलून फक्त आमदारी मिळावी यासाठीचे प्रयत्न दिसून येत आहेत. एकाबाजूला सत्तेत राहून आंदोलन करायचे आणि दुसऱ्या बाजूला कारखाना मालकांच्या मांडीला मांडी लावून बसायचे. हे उद्योग बंद करा,” असा इशारा भाजप नेते सदाभाऊ खोत यांनी दिला.

“सध्याचे सरकार कुचकामी”

“अजून किती दिवस साखरेचा गोड चहा घेत राहणार, किती दिवस आमरस खात राहणार, आता हे सर्व सोडून शेतकऱ्यांना मूर्ख बनवण्याचे उद्योग बंद करा. सरकारमध्ये असताना उगाचच दिल्लीत आंदोलन कसे काय करता,” असा सवालही सदाभाऊ खोत यांनी उपस्थित केला.

“आमच्या सरकारमध्ये शेतकऱ्यांना न्याय मिळवून दिला. त्याचे प्रश्न सोडवले. तसेच अनेक योजनेच्या माध्यमातून शेतकऱ्यांना संरक्षण देण्याचे प्रयत्न माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केला. मात्र सध्याचे सरकार कुचकामी असून शेतकऱ्यांच्या बाजूने बोलत नाही. तसेच यांना शेतकऱ्याचे काही घेणे देणे नाही. फक्त स्वार्थ साधायचा,” अशी टीकाही खोत यांनी केली.

“डोक्यात भ्रम निर्माण केल्यामुळे दिल्लीत शेतकऱ्यांचे आंदोलन”

“केंद्राने केलेल्या आध्यादेशचे रूपांतर आता कायद्यात झाले आहे. त्याबाबत अनेकांनी त्याचे स्वागत केले आहे. तीन कायद्याच्या माध्यमातून बाजारपेठेतून स्वतंत्र मिळाले आहे. या नवीन कायद्यामुळे शेतकरी आणि बाजारपेठांना फायदा होणार आहे. पण काहींनी डोक्यात भ्रम निर्माण केल्यामुळे दिल्ली येथील शेतकरी आंदोलन सुरू आहे.”

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

पार्थ पवारांबद्दल प्रश्न विचारला असता सुप्रिया सुळेंनी दिली ही प्रतिक्रिया

News Desk

महाविकासआघाडी सरकार अस्थिर करण्याच्या भाजपच्या प्रयत्नांना यश मिळत नाहीये. त्यामुळे अशाप्रकारची टोकाची भूमिका! – शरद पवार

Aprna

“…तर दारूचा व्यवसाय करताना सरकारी नियमांची पायमल्ली” – नवाब मलिक

News Desk