HW News Marathi
महाराष्ट्र

शाहू महाराजांच्या आशीर्वादाने संभाजीराजेंनी फुंकलं रणशिंग ! महाराष्ट्र दौरा सुरू

कोल्हापूर | कायद्याच्या कचाट्यात अडकलेल्या मराठा आरक्षणाच्या लढ्यासाठी खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी आता रणशिंग फुंकले आहे. राज्यातील मराठा समाजाच्या अपेक्षा समजून घेण्यासाठी मुंबई आणि मराठवाड्याचा दौरा करणार असल्याची घोषणा संभाजीराजे यांनी केली आहे.

संभाजीराजे यांनी आज (२४ मे) शाहु महाराजांच्या समाधीस्थळी जाऊन दर्शन घेतल्यानंतर आरक्षणावरील भूमिका स्पष्ट केली आहे. यावेळी त्यांनी माध्यमांशी संवाद साधताना सांगितले की, बहुजन समाजाचा मराठा आरक्षणाला पाठिंबा आहे. मराठा समाजाच्या नेमक्या अपेक्षा समजून घेण्यासाठी राज्याचा दौरा करणार आहे.

मराठा समाजाच्या अपेक्षा समजून घेणार

मराठा समाजाच्या अपेक्षा समजून घेण्यासाठी संपूर्ण महाराष्ट्रभर फिरणार असल्याचं खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी सांगितलं. त्याचबरोबर येत्या २७ तारखेला मुख्यमंत्र्यांची भेट घेऊन पुढचा निर्णय घेणार असल्याचंही त्यांनी यावेळी स्पष्ट केलं. या महाराष्ट्र दौऱ्याची सुरुवात त्यांनी छत्रपती शाहू महाराजांच्या समाधीस्थळाचं दर्शन घेऊन केली आहे.

मराठा समाजाची भूमिका समजून घेण्यासाठी आपण मराठवाडा खानदेश असा महाराष्ट्र दौरा करणार आहोत आणि त्या माध्यमातून आरक्षणाच्या प्रश्नावर मार्ग काढणार असल्याचं संभाजीराजे यांनी सांगितलं आहे. आंदोलन हा एक भाग आहे. पण सध्या कोरोनाच्या प्रादुर्भावाचा विचार करता जीव वाचणं महत्त्वाचं आहे, त्यामुळे अशा वेळी आंदोलन हा विषयच चुकीचा आहे, त्यामुळे या प्रश्नावर अन्य मार्ग काढण्यासाठी आपण मुख्यमंत्री, विरोधी पक्षनेते, सर्व आमदार, खासदार, मंत्री यांना भेटणार आहे, असंही ते म्हणाले आहेत.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची घेणार भेट

येत्या २७ तारखेला या सगळ्यांची भेट घेऊन त्यांना मराठा समाजाची भूमिका समजावून देणार असल्याची माहिती संभाजीराजे यांनी दिली आहे.मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी भेटीसाठी फोन केल्यांचे संभाजीराजे यांनी सांगितले आहे. त्यानंतर त्यांना २७ मे किंवा २८ मे रोजी सकाळी मुख्यमंत्री, विरोधी पक्षनेते तसेच इतर मोठ्या नेत्यांशी चर्चा करणार असल्याचे ते म्हणाले आहेत.

मराठा समाजाला नेत्यांनी वेठीस धरू नये

मराठा समाजाला नेत्यांनी वेठीस धरू नये, असा इशाराही त्यांनी यावेळी दिला. मराठा आरक्षणावर सर्वपक्षीय नेत्यांनी मार्ग काढावा असे आवाहनही त्यांनी यावेळी केले. संभाजीराजे यांनी कोरोना संकटात जीव महत्त्वाचा असल्याने मराठा समाजाने संयम बाळगावा असे आवाहन केले.

ते पुढे असं देखील म्हणाले, केंद्र आणि राज्य सरकारांनी अशी भूमिका घ्यावी की समाजाला पुन्हा रस्त्यावर उतरायला लागू नये. आधीच ५८ मोर्चे काढले आहेत. अजून किती वेळा लोकांना रस्त्यावर आणायचं? सध्या मराठा समाज अस्वस्थ असला तरीही करोना काळात जीव महत्त्वाचा त्यामुळे अशा वेळी आंदोलन हा पर्याय नाही.

सर्वोच्च न्यायालयाने गायकवाड समितीचा अहवाल धुडकावून लागला. त्यामुळे मराठा समाजावर अन्याय झाला आहे. यावर मार्ग काढण्यासाठी महाराष्ट्र दौरा करत आहे. बहुजन समाजाला न्याय देण्यासाठी शाहू महाराजांनी चळवळ सुरु केली. त्यांनी राज्याला देशाला पुरोगामी चळवळीची दिशा दिली, असंही ते म्हणाले आहेत.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

“तुम्ही फक्त लॉकडाऊन घोषित करण्यापुरते मुख्यमंत्री झाले आहात का?”, पडळकरांचा सवाल

News Desk

शाळेत ४० मिनीटांचे ४ तासच होणार – वर्षा गायकवाड

News Desk

नितेश राणेंना आणखी एक धक्का; सहकार विभागाने राणेंचा मतदानाचा अधिकार नाकारला

Aprna