HW News Marathi
Covid-19

परप्रतियांना फुकट सोडणाऱ्या सरकारकडून दलालांमार्फत जनतेची लूट !

मुंबई | गणेशोत्सवासाठी कोकणात जाऊ इच्छिणाऱ्या चाकरमान्यांची ई-पासच्या नावावर सध्या लूट सुरु आहे. या प्रकरणाशी संबंधित असलेल्यांना आता महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून इशारा देण्यात आला आहे. संपूर्ण राज्यभरात ई-पासचा काळाबाजार सुरु आहे. हा काळबाजार करून चाकरमान्यांची फसवणूक करणाऱ्या दलालांना मनसे ठोकून काढेल, असा इशारा मनसेचे सरचिटणीस संदीप देशपांडे यांनी दिला आहे. एका ऑडिओ क्लिपच्या माध्यमातून हा प्रकार उघडकीस आला असून मनसेने सरकारवर निशाणा साधला आहे.

“परप्रतियांना फुकट सोडणारे सरकार दलालांच्या मार्फत जनतेला लुटत आहे”, असा गंभीर आरोपही संदीप देशपांडे यांनी केला आहे. संदीप देशपांडे यांनी ट्विटरवर एक ऑडिओ क्लिप पोस्ट करत या प्रकरणाबाबतची माहिती दिली आहे. मनसे सैनिक आणि ई-पास दलालमधील फोनवरून संभाषणात या दलालाकडून ४ जणांना ई-पास मिळवून देण्यासाठी २ हजारांची मागणी करण्यात आली. “सर्वसामान्यांनी अर्ज केला तर त्यांना ई-पास मिळत नाही. मात्र, एखाद्या दलालाला तो लगेच मिळतो”, असेही त्यांनी म्हटले आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

पोहरादेवी गडावरील गर्दीबाबत कारवाई करा ! मुख्यमंत्र्यांचे आदेश

News Desk

Unlock 1.0 | देशात गेल्या २४ तासात ९९८३ नवे कोरोना रुग्ण आढळले

News Desk

पुण्यात रुग्ण बरे होणाऱ्यांचे प्रमाण ८२.९४ टक्के…

News Desk