HW News Marathi
महाराष्ट्र

सरकार स्वत: भिकारी आणि लोकांना भिकारी बनवायचे चाळे सुरू”, मनसेची घणाघाती टीका 

मुंबई | मनसेचे सरचिटणीस संदीप देशपांडे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर जोरदार टीका पुन्हा एकदा केली आहे. “कोरोना हा फक्त रात्रीच परसतो का? दिवसा पसरत नाही का? सरकारकडून जनतेला कोणतंही आर्थिक सहाय्य दिलं जात नाहीये. उलट माफ केलेले कर पुन्हा वसूल केले जात आहेत. विद्यार्थ्यांच्या शाळेच्या फी भरायच्या आहेत. वीज बिलाच्या दरात वाढ करून ठेवली आहे. सरकार म्हणून तुम्ही जनतेला काहीच दिलासा देत नाही. अमेरिकेप्रमाणे हे सरकार आर्थिक पॅकेज महाराष्ट्रातील जनतेसाठी जाहीर करत नाहीच, पण याउलट संचारबंदी करून लोकांना त्यांच्या उपजिविकेसाठी कामही करू दिलं जात नाहीये. अशा परिस्थितीत जनतेने पैसे आणयचे कुठून?”, असा सवाल त्यांनी टीव्ही९शी बोलताना उद्धव ठाकरे सरकारला केला. याचवेळी बोलताना,“सरकार स्वत: भिकारी आणि लोकांना भिकारी बनवायचे चाळे सुरू”, अशी टीका त्यांनी केली.

“सेलिब्रिटीच्या नाईट पार्टीसमध्ये करोना जात नाही का? रेसकोर्सवर होणाऱ्या पार्ट्यांना करोना जात नाही का? मुख्यमंत्र्यांनी सह्याद्री अतिथीगृहावर मंत्र्यांना दिलेल्या पार्टीत करोना येऊ शकत नव्हता का? माणसं पाहून कोरोना फिरतो का? सेलिब्रिटींना सारं काही माफ आणि नियम केवळ जनतेसाठी असा या सरकारची भूमिका आहे का? कोरोना संदर्भातील दुसरा म्युटेड व्हायरस ब्रिटनमध्ये सापडला म्हणून संचारबंदी केली. असेच भविष्यात तिसरे चौथे व्हायरस सापडू शकतील म्हणून काय जनतेला कायम लॉकडाउनमध्ये ठेवणार का?”, असा रोखठोक सवाल त्यांनी उद्धव ठाकरेंच्या सरकारला विचारला.

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

जनाशीर्वाद यात्रेवर मुंबईत दाखल झाले ३६ गुन्हे!

News Desk

‘मराठा आरक्षणासाठी मुंबईत होतो’ म्हणुन कृषी विधेयक मंजूरीदरम्यान राज्यसभेत गेलो नाही – शरद पवार

News Desk

मुख्यमंत्री आज नाशिक, नंदुरबार दौऱ्यावर जाणार

News Desk