HW News Marathi
महाराष्ट्र

अस्मिता महत्वाची की लाचारी ते नांदगावकर यांनी ठरवावं – संदीप देशपांडे

मुंबई | गेले काही दिवस कोरोना रुग्णांच्या नातेवाइकांना रुग्णालयातून अधिक पैसे घेण्याच्या घटना घडत आहेत. याविरुद्ध शिवसेना नेते नितीन नांदगावकर यांनी आक्रमक पवित्रा हाती घेत रुग्णालयात जाऊन रुग्णालय आणि त्यांच्या प्रशासनाला जाब विचारला होता. त्यानंतर त्यांना धमकीचा फोन आला होता, त्याबद्दल त्यांनी पोलिसात तक्रार दाखल केली आहे. या वरून आता मनसे सरचिटणीस संदीप देशपांडे यांनी नांदगावकर यांना प्रश्न विचारला आहे.

मनसे सरचिटणीस संदीप देशपांडे यांची प्रतिक्रिया समोर आली आहे. “अस्मिता महत्वाची की लाचारी ते नांदगावकर यांनी ठरवावं” असे ट्वीट देशपांडे यांनी केले आहे. नितीन नांदगावकर यांनी विधानसभा निवडणुकीपूर्वी मनसे. सोडत सेनेत प्रवेश केला होता. आक्रमक भूमिका, परप्रांतीयांविरोधातील आंदोलन आणि सोशल मीडियावरील प्रसिद्ध चेहरा म्हणून नितीन नांदगावकर यांची ओळख आहे.

 

नांदगावकर यांनी काय दाखल केली तक्रार?

“मी तीन दिवसांपूर्वी शिवसेनेच्या वतीने हिरानंदानी रुग्णालयात गेलो होतो, कोरोनाग्रस्त रिक्षाचालकाचा मृतदेह ताब्यात देण्याबाबत आणि कुटुंबाला दिलेले बिल कमी करण्याबाबत जाब विचारला होता. तेव्हा माझा तिथल्या सुरक्षा रक्षकांशी वाद झाला. त्यावेळी रुग्णालयाचे सीईओ सुदीप चटर्जी यांनी मला दम देऊन आठ लाख रुपये भरा आणि मृतदेह घेऊन जा, असे सांगितले होते.” असे नांदगावकर यांनी तक्रारीत म्हटले आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

निवडणुकांचे अंदाज बांधने बंद करा – राज्यमंत्री बच्चु कडू

News Desk

मंत्रालयात मिटिंग घेऊन अन्वय नाईक प्रकरण दाबण्यात आलं, गृहमंत्र्यांचे मोठे वक्तव्य

News Desk

पाटण विधानसभा मतदार संघातील पाणी पुरवठा योजनांचा शंभूराज देसाईंनी घेतला आढावा

Aprna