HW News Marathi
महाराष्ट्र

“बहिरा स्वतःच्या तालावर नाचे”, कॉंग्रेसचा राज ठाकरेंना टोला

मुंबई | महाराष्ट्रात कोरोना वाढण्यास स्थलांतरित जबाबदार असल्याचं वक्तव्य महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केल्यानंतर काँग्रेस नेते संजय निरुपमयांनी निशाणा साधला आहे. “बहिरा नाचे आपन ताल!” म्हणजे “बहिरी व्यक्ती स्वतःच्याच तालावर नाचते” अशा अर्थाची टीका निरुपम यांनी केली आहे. दरम्यान, राज्यात कोरोना संख्या सातत्याने वाढत असून सरकारची चिंता दिवसेंदिवस वाढत चालली आहे. याच मुद्यावर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मनसे प्रमुख राज ठाकरे यांच्याशी फोनवर चर्चाही केली होती.

राज ठाकरेंचा परप्रांतीयविरोधी सूर

मुंबईतील वाढत्या समस्यांना परप्रांतीय जबाबदार असल्याचा दावा राज ठाकरे सुरुवातीपासूनच करत आले आहेत. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे परप्रांतीयविरोधी धोरण सर्वश्रुत आहे. गेल्या वर्षी परप्रांतीय मजूर मुंबई आणि महाराष्ट्राबाहेर जात असतानाही राज ठाकरेंनी त्यांना परत घेताना मोजणी आणि चाचणी करण्याच्या सूचना दिल्या होत्या. दुसरीकडे, काँग्रेस नेते संजय निरुपम यांनी परप्रांतीयांविषयी कायम कणव बाळगला आहे. कालच्या पत्रकार परिषदेत राज ठाकरेंनी पुन्हा परप्रांतीयविरोधी सूर आळवल्याने निरुपम यांनी ट्विटरवरुन राज ठाकरेंन कानपिचक्या लगावल्या आहेत.

काय म्हणाले होते राज ठाकरे?

“बाहेरच्या राज्यातून येणारी माणसं आणि त्यांची न झालेली चाचणी यामुळे कोरोना वाढला. तसेच इतर राज्यात कोरोना रुग्णांची चाचणीच केली जात नाहीत. त्यामुळे त्या राज्यात किती रुग्ण आहेत याचे आकडेच येत नाहीत. महाराष्ट्रात कोरोनाची टेस्टिंग केली जात आहे. त्यामुळे कोरोनाचे आकडे बाहेर येतात” असं राज ठाकरे काल म्हणाले होते.

“राज्यात परत येणाऱ्या बाहेरच्या लोकांची मोजणी करावी आणि त्यांची चाचणी करावी अशी सूचना मी केली होती. परंतु, त्याकडे लक्ष दिलं नाही. कुणाचीही मोजणी आणि चाचणी केली नाही. त्यामुळे ही संख्या वाढली आहे. कोण येतंय कोण जातंय हे कुणालाच माहीत नव्हतं. आज कोरोना आहे, उद्या आणखी काही असेल. हे दुष्टचक्र न थांबणारं आहे” असंही ते म्हणाले.

राज ठाकरे यांनी केलेल्या सूचना

उत्पादन : छोट्या व्यापाऱ्यांना उत्पादन करण्यास सांगितलं मात्र विक्री करण्यास मनाई केली. अशा व्यापाऱ्यांसाठी आठवड्यांतून दोन किंवा तीन वेळा दुकानं खुली ठेवण्यास परवानगी दिली.

बँक : लोकांकडे पैसे असतील तर त्यांना बँकांकडे जातील. सरकारने बँकांशी बोलून घ्यावं. बँक सक्तीने पैसे वसूल करत आहेत.

वीज बिल माफ करणे : व्यायसायिकांना वीज बिल माफी द्यावी, लोकांना दिलासा देणं गरजेचं आहे. निर्बंधांच्या काळातील वीज बिल सरकारने माफ करावं

कंत्राटी कामगार : अनेक कंत्राटी कामगार सरकारने घेतलं होतं. या कामगारांना परत बोलवा, त्यांना महापालिकेत कायमस्वरुपी घ्यावं. कंत्राटी कामगारांच्या विषयाकडे लक्ष द्यावं.

मनोरंजन क्षेत्र, सलून यांनाही आठवड्यातून दोन-तीन वेळा दुकानं सुरु करण्यास परवानगी द्यावी.

क्रीडा क्षेत्र : सराव करणाऱ्या सर्व खेळांडूना परवानगी मिळणं आवश्यक आहे. गर्दी होणार नाही, परंतु सराव करायला मंजुरी मिळावी.

शेतकरी : राज्य सरकारने शेतकऱ्यांना हमीभाव द्यावा. एकदा शेतकरी कोसळला तर पुन्हा संकट आपल्यावर येईल.

शाळा : शाळा बंद आहे, तरी फी आकारणं सुरुच आहे. विद्यार्थ्यांचं वर्ष वाया गेलं आहे.दहावी-बारावीच्या विद्यार्थ्यांच्या परीक्षा न घेता त्यांना प्रमोट केलं पाहिजे. विद्यार्थ्यांप्रमाणे शाळांचाही विचार सरकारने करावा.

पत्रकार परिषदेच्या सुरूवातीला बोलताना राज ठाकरे म्हणाले,”काल मी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना मी कॉल केला होता. लॉकडाउनच्या संदर्भात मी त्यांना भेटीची विनंती केली होती. त्यांचा मला कॉल आला. त्याच्या आजूबाजूला कोविड पॉझिटिव्ह आहेत. त्यामुळे त्यांनी स्वतःला आयसोलेट करून घेतलं आहे. त्यांनी झूमवर बोलता येतील, असं ते म्हणाले. पुन्हा एकदा लॉकडाउन हे लोकांमध्ये पसरलं. रुग्णांची संख्या वाढतीये. किंबहुना…. किंबहुना वापरलं तर चालेल ना?,” असं राज म्हणाले. त्यावर सगळ्यांनी हसून होकार दिला.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

कितीही संकट येवोत, महाराष्ट्र कधीही झुकला नाही, झुकणार नाही !

News Desk

“…तर शरद पवारांनी उजणी धरणच पुणे जिल्ह्यात वळवलं असतं,” सरकारला आमदाराचा घरचा आहेर

News Desk

मुख्यमंत्र्यांच्या रायगड फार्महाऊसची रेकी करणाऱ्या ३ जणांना अटक

News Desk