HW News Marathi
महाराष्ट्र

‘अजून तरी देशानं लाज सोडलेली नाही, २०२४ मध्ये ते दिसेलच’- संजय राऊत

मुंबई | ‘भारत हा स्वाभिमान नसलेल्या निर्लज्ज लोकांचा देश आहे. जगाच्या पाठीवर १८७ राष्ट्र आहे. त्यात १ अब्ज २३ कोटी लोकांचा एक देश जगात आहे. प्रदीर्घ काळ परक्यांचा मार खात, परक्यांचा दास्यत्व पत्करत, परक्यांचं खरकटं उष्टं खात राहिलेला निर्लज्ज लोकांचा हा देश आहे, तो म्हणजे भारत,’ असं वक्तव्य संभाजी भिडे यांनी केलं आहे. त्यावर संजय राऊत यांनी आता प्रतिक्रिया दिली आहे.

राऊत यांनी भिडे यांच्या वक्तव्यावर अत्यंत सूचक व खोचक प्रतिक्रिया

‘शिवप्रतिष्ठान हिंदुस्तान’चे प्रमुख संभाजी भिडे यांनी केलेल्या वादग्रस्त वक्तव्यावरून सध्या वातावरण ढवळून निघालं आहे. शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी भिडे यांच्या वक्तव्यावर अत्यंत सूचक व खोचक प्रतिक्रिया दिली आहे. मुंबईत ते पत्रकारांशी बोलत होते.

‘शिवसेना राष्ट्रीय राजकारणात सक्रिय आहेच, पण २०२४ नंतर शिवसेना राष्ट्रीय राजकारणाच्या केंद्रस्थानी असेल. आज लोकसभेत १८ आणि राज्यसभेत ३ मिळून एकूण शिवसेनेचे २१ खासदार संसदेत आहेत. दादरा नगरहवेलीमध्ये कलाबेन डेलकरही निवडून येणार आहेत. त्यानंतर २२ खासदार होतील,’ असा विश्वासही राऊत यांनी व्यक्त केला. भिडे यांच्या या वक्तव्याबद्दल संजय राऊत यांना विचारलं असता त्यांनी फार काही बोलण्यास नकार दिला. ‘आज विजयादशमी आहे. अशा दिवशी शुभ बोललं पाहिजे. अजून तरी या देशानं लाज सोडलेली नाही. २०२४ मध्ये ते स्पष्ट दिसेल,’ असा टोला राऊत यांनी हाणला.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.
Some error occurred

Related posts

वर्षभरात कोकणाला तिसरा फटका, आतातरी सरकारने मदत द्यावी

News Desk

उरणच्या खोपटा पुलावर दहशतवादी संघटनेच्या मजकूराने खळबळ

News Desk

मुख्यमंत्र्यांच्या भेटीसाठी राज्यपाल ‘मातोश्री’वर

News Desk