HW News Marathi
महाराष्ट्र

सगळ्यांचा कोथडा काढून शिवाजी महाराजांनी स्वराज्य टिकवलं आणि महाराष्ट्रातही तसंच होईल – संजय राऊत

मुंबई | आज (१९ फेब्रुवारी) छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतनिमित्त सगळीकडे उत्साहाचे वातावरण आहे. दरम्यान, शिवसेना खासदार संजय राऊत यांनी शुभेच्छा दिल्या आहेत. छत्रपती शिवाजी महाराजांनाही विरोधक होते. अफजल खान, शाहिस्ते खान होता. पण तरीही शिवाजी महाराज खचले नाहीत. सगळ्यांचा कोथडा काढून शिवाजी महाराजांनी स्वराज्य टिकवलं. महाराष्ट्रातही तसंच होईल, असा टोला विरोधकांना शिवसेना नेते संजय राऊत यांनी लगावला आहे.

संजय राऊत यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना विरोधकांवर टीकास्त्र सोडलं. न्याय कसा असावा हे सैन्याला शिवाजी महाराजांनी सांगितलं. आज शेतकऱ्यांच्या पोटाला, देठाला, अस्तित्वाला धक्का लागतोय, ही परिस्थिती विकट आहे, असं राऊत म्हणाले आहेत.

शिवाजी महाजांच्या महाराष्ट्रात उद्धव ठाकरे मुख्यमंत्री याचा अभिमान

शिवाजी महाराजांचा उत्सव हा देशात साजरा होतोय. शिवाजी महाराजांकडून संपूर्ण देश खरी प्रेरणा घेतोय. आपण त्यांना हिंदवी स्वराज्य संस्थापक म्हणतो. निश्चयाचा महामेरू म्हणतो, महाराष्ट्राला इतिहास आहे, इतरांना भूगोल असेल… अशा शिवाजींचा जन्म इथे झाला हे महत्वाचं… ज्या शिवाजींच्या महाराष्ट्रात उद्धव ठाकरे हे मुख्यमंत्री झाले, ही आमच्यासाठी अभिमानाची बाब, असंही ते म्हणाले आहेत.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

पुण्याच्या अतिरिक्त जिल्हाधिकारीपदी अजित पवारांच्या मर्जीतील विजय देशमुख यांची नियुक्ती !

News Desk

शेतकऱ्यांनो धीर धरा, शासन तुमच्या पाठीशी! – डॉ. नितीन राऊत

Aprna

पंजाबचे मुख्यमंत्री अमरिंदर सिंग यांचा राजीनामा!

News Desk