HW News Marathi
महाराष्ट्र

‘अमर-अकबर-अँथनी’ कधीच गुण्यागोविंदाने एकत्र राहू नयेत असे भाजपला स्थापनेपासूनच वाटत आले – सत्यजीत तांबे

मुंबई | राज्यात विरोधी पक्ष आणि आघाडी सरकार यांच्यात शाब्दिक वार सुरूच आहेत. भाजप नेते आणि केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी ‘अमर-अकबर-अँथनी’ अशा शब्दात महाविकास आघाडीवर टिव्ही ९ मराठीशी बोलताना टीका केली होती. त्यावर, आता महाराष्ट्र युवा काँग्रेसचे अध्यक्ष सत्यजीत तांबे यांनी पलटवार केला आहे.

“देशात ‘अमर-अकबर-अँथनी’ कधीच गुण्यागोविंदाने एकत्र राहू नयेत असे भाजपला स्थापनेपासूनच वाटत आले आहे. द्वितीय सरसंघचालक गोळवलकर यांनीसुद्धा ‘बंच ऑफ थॉट्स’ मध्ये हीच शिकवण दिली आहे, इतिहास साक्ष आहे. बाकी, महाराष्ट्र विकास आघाडीची चिंता नसावी !” असे ट्वीट सत्यजीत तांबे यांनी केले आहे.

राज्यातील महाविकास आघाडीचे सरकार अमर, अकबर अँथनीचे सरकार आहे. ते पायात पाय घालून आपोआपच पडेल, असा टोमणा भाजप नेते आणि केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी टीव्ही 9 मराठीशी बोलताना लगावला होता. राज्य सरकारने दूध उत्पादक शेतकऱ्यांना मदत करावी, केंद्र सरकार तर मदत करतच आहे, असेही दानवे म्हणाले होते.

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.
Some error occurred

Related posts

अजितदादा जसा राजीनामा खिशात घेऊन फिरत होता तसा तो ६ हजार कोटींचा चेक घेऊन फिरत आहात त्याचं काय करणार?

News Desk

ग्रामपंचायत निवडणूक : परळी मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेस व धनंजय मुंडेंचे एकेरी वर्चस्व

News Desk

सगळ्यांनी वेगवेगळे लढून पाहू, पण २ दिवस आधी सेटलमेंट करायची नाही, चंद्रकांत पाटलांचे शरद पवारांना आवाहन

News Desk