HW News Marathi
महाराष्ट्र

कर्नाटकातील हाईवोल्टेज ड्रामा : आमदारांमुळे पवईत मुंबई पोलिसांकडून संचार बंदी लागू

मुंबई | कर्नाटकातील हाईवोल्टेज ड्रामा थांबन्याचे नाव घेण्याची चिन्हे दिसत नाही. कर्नाटकातील आमदारांमुळे मुंबई पोलिसांकडून पवईत संचार बंदी लागू केली आहे. संचार बंदीमुळे संपूर्ण परिसरात २ पेक्षा जास्त लोक एकत्र उभे राहू शकत नाही. पोलिसांनी १२ जुलैपर्यंत ही संचार बंदी लागू राहणार असल्याची माहिती मिळाली आहे. कर्नाटकातील राजीनामा दिलेले आमदारांची मने वळविण्यासाठी काँग्रेसचे संकटमोचक डी. के. शिवकुमार आज (१० जुलै) मुंबईमध्ये दाखल झाले आहेत. १३ आमदार मुंबई येथील पवई येथील रेनेसाँ हॉटेलमध्ये थांबले आहेत.

या सर्वांचे मनविण्यासाठी शिवकुमार यांच्यासोबत जेडीएस नेते शिवलिंगे गौडा आणि काही अन्य काँग्रेसचे नेते या आमदारांनापेटून कर्नाटकावर आलेले राजकीय संकट निरस करण्याचा प्रयत्न करण्यासाठी आले आहे. परंतु शिवकुमार यांचे रेनेसन्स हॉटेलमधील आपात्कालीन परिस्थितीमुळे त्यांचे बुकिंग रद्द केली आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.
Some error occurred

Related posts

एसओपी निश्चित झाल्यावर सिनेमागृहे सुरु करण्याबाबत विचार – मुख्यमंत्री 

News Desk

गावी जाण्याची सोय होईपर्यंत विद्यार्थ्यांना वसतिगृह सोडण्याची सक्ती नाही

swarit

अन्वय नाईक यांची ‘ती’ सुसाईड नोट आली समोर

News Desk