HW News Marathi
देश / विदेश

मुंबईतील ताज हॉटेल बॉम्बने उडवण्याची धमकी, पाकिस्तानतून धमकीचा फोन

मुंबई | पाकिस्तानच्या कराचीमधल्या शेअर बाजारात दहशतवादी हल्ला झाला. यानंतर आता देशाची आर्थिक राजनाधी असलेल्या मुंबईतील ताज हॉटेलमध्ये काल (२९ जून) बॉम्बने उडवण्याची धमकी देणारा फोन आला असून हा फोन पाकिस्तानमधून ताज हॉटेलमध्ये करण्यात आला होता. या प्रकरणाची माहिती ताज हॉटेल व्यवस्थापनाने मुंबई पोलिसांनी माहिती दिली आली. त्यानंतर मुंबई पोलिसांनी ताज हॉटेल बाहेरील सुरक्षा वाढवण्यात आली आहे.

मुंबईनंतर पोलिसांनी रात्रभर हॉटेल स्टाफ यांनी मिळून सुरक्षेची पाहणी केली. हॉटेलमध्ये येणारे गेस्ट आणि त्यांच्या हालचालींवरही नजर ठेवण्यात येणार आहे. याव्यतिरिक्त दक्षिण मुंबई आणि किनारपट्टीवरील गस्त आणि सुरक्षा वाढवण्यात आली आहे. २६ नोव्हेंबर २००८ हा दिवस मुंबईसाठी काळा दिवस ठरला होता. समुद्रमार्गाने आलेल्या पाकिस्तानच्या दहशतवाद्यांनी मुंबईला वेठीस धरले होते. जवळपास ६० तास सुरक्षा यंत्रणांचे ऑपरेशन सुरू होते. या दहशतवादी हल्ल्यात जवळपास १६६ लोक मृत्यूमुखी पडले होते, तर ३०० पेक्षा अधिक लोक जखमी झाले होते. दहशतवादी अजमल कसाबची तपास यंत्रणांकडून कसून चौकशी करण्यात आली. त्यातून पाकिस्तानचा सहभाग उघड झाला. २१ सप्टेंबर २०१२ रोजी पुण्याच्या येरवडा तुरुंगात त्याला फाशी देण्यात आली.

 

 

 

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

दिल्लीतून उगम पावलेले हे ग्रहण कधी सुटणार ? | धनंजय मुंडे

News Desk

#CoronaVirus | राज्यात आज आणखी नव्या ११७ कोरोनाबाधितांची नोंद

News Desk

५० टक्के शिक्षक आणि कर्मचाऱ्यांसह ‘या’ राज्यांत शाळा सुरू होणार

News Desk