HW News Marathi
महाराष्ट्र

कुणीच कुणाला पाडत नसते, महाजनांकडून खडसेंच्या आरोपाचे खंडन

जळगावात | विधानसभा निवडणुकीत पंकजा मुंडे आणि रोहिणी खडसे यांच्या पराभवामागे पक्षांतर्ग नेते जबाबदार असल्याचा आरोप भाजपचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांनी केला होता. खडसेंच्या खळबळजनक आरोपामुळे राज्याच्या राजकीय वर्तुळात उलट सुलट चर्चेला उधाण आले. या पार्श्वभूमीवर भाजपचे संकटमोचक म्हणून ओळखले जाणारे माजी मंत्री गिरीश महाजन यांनी खडसेंच्या आरोपाचे खंडन केले आहे.

महाजन म्हणाले की, “कुणीच कुणाला पाडत नसते. मुक्ताईनगर मतदारसंघातून खडसे हे यापूर्वी १२०० आणि त्यानंतर ८५०० हजार मतांनी निवडून आले आहेत. यंदा खडसेंना पक्षश्रेष्ठीकडून तिकीट नकारत त्यांची मुलगी रोहिणी खडसेंना तिकीट देण्यात आले. . सर्व भाजपच्या कार्यकर्त्यांनी जोमाने काम केले. यंदाची मुक्ताईनगरमधील निवडणुकीत अटीतटीचा सामना होता. शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस हे तिन्ही पक्ष तिथे एकत्र आले होते. त्यामुळे रोहिणी खडसेंना पराभवाचा सामना करावा लागला,” असे महाजन आज (६ डिसेंबर) जळगावमध्ये आयोजित पत्रकार परिषदेत म्हणाले.

भाजपमधील सर्वात महत्त्वाची पदे ओबीसींकडे

महाजन पुढे म्हणाले, “भाजपमधून १२ आमदार बाहेर पडणार असल्याच्या अफवा पसरवल्या जात आहेत. आमच्या पक्षातून एकही आमदार बाहेर पडणार नाही, असा दावा देखील त्यांनी केला. भाजपमधील सर्वात महत्त्वाची पदे ओबीसींकडे आहेत. आपण स्वत: ओबीसी आहोत. कुणी पक्ष सोडून जाईन, नाराज आहेत, अपयश आल्याने थोडे दिवस असे घडत असते, असेही ते म्हणाले.

 

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.
Some error occurred

Related posts

मुंबई, कोकणात १३ तारखेपर्यंत मुसळधार पावसाचा इशारा, NDRF ची पथकंही तैनात

News Desk

मराठा आरक्षणाचा निर्णय तातडीने घ्या, पंतप्रधानांना हातजोडून मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंची विनंती

News Desk

बारावीच्या निकालाबाबत अद्याप निर्णय नाही!

News Desk
Uncategorized

#HyderabadEncounter : आरोपींच्या एन्काऊंटरचा पोलिसांनी सांगितला ‘हा’ घटनाक्रम

News Desk

हैदराबाद | हैदराबादमधील वशुवैद्यकी तरुणीवर बलात्कार आणि हत्या प्रकरणातील चार आरोपींना तेलंगणा पोलिसांकडून आज (६ डिसेंबर) पहाटे ५.४५ वाजता एन्काऊंटर करण्यात आले. तेलंगणा पोलिसांकडून पीडित तरुणींला जीवत जाळलेल्या ठिकाणी या चारही आरोपींना घटनास्थळावर गुन्ह्यांचा घटनाक्रम जाणून घेण्यासाठी नेले होते. मात्र, आरोपींनी या घटनास्थळावून पळून जाण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी पोलिसांनी त्या आरोपींना पकडण्याचा प्रयत्न केला होता. परंतु, यात पोलिसांना यश आले नाही. त्यामुळे अखेर पोलिसांनी आरोपींवर गोळीबार करत त्यांचे आरोपींचा एन्काऊंटर केल्याची माहिती सायबराबादचे पोलीस आयुक्त व्ही. सी. सज्जनार यांनी पत्रकार परिषद घेऊन त्या ३० मिनिटांक काय घडले त्यांचा सविस्तर वृत्तांत दिला.

पोलीस आयुक्त सज्जनार पुढे म्हणाले की, “मानवाधिकार आयोग किंवा अन्य कोणत्याही संघटनांच्या चौकशी आणि प्रश्नांना सामोरे जाण्यास आम्ही तयार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.” या प्रकरणात आरोपींना तेलंगाणामधील शादनगर दंडाधिकाऱ्यांनी १० दिवसांच्या न्यायालयीन कोठडीत सुनावली होती. या प्रकरणातील संपूर्ण घटनाक्रम जाणून घेण्यासाठी या चारही आरोपींना पोलिसांनी घटनास्थळी घेऊन गेले होते. दरम्यान, आरोपी चेन्नाकेशवुलु आणि आरिफ यांनी पोलिसांजवळील बंदूक हिसकावून त्यांच्यावर काठी आणि दगडाने पोलिसांवर हल्ला करत पळ काढण्याचा प्रयत्न केला. आणि इतर नवीन आणि शिवा यांनी दोन आरोपींनी पोलिसांवर गोळीबारदेखील केला. या गोळीबारात २ पोलीस कर्मचारी जखमी झाले असून त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. सध्या या पोलिसांची प्रकृती स्थिर आहे. घटना सकाळी ५.४५ ते ६.१५ वाजण्याच्या दरम्यान घडली.

Related posts

Sangram Jagtap| राष्ट्रवादीचे आमदार संग्राम जगताप शिवसेनेच्या वाटेवर.!

Arati More

सुषमा स्वराज पुढच्या पंतप्रधान ?

News Desk

स्तनांचा कर्करोग दरवर्षी ७६ हजार बळी घेणार

News Desk