HW News Marathi
महाराष्ट्र

“व्हॅलेन्टाईन डेच्या निमित्ताने आम्ही ७ नगरेसवक उद्धव ठाकरे यांच्याकडे पाठवतोय” – नितेश  राणे

सिंधुदुर्ग | राणे बंधु कायम शिवसेना आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर टीका करत असतात. आता पुन्हा एकदा भाजप आमदार नितेश राणे यांनी शिवसेनेवर आणि उद्द ठाकरेंवर शिरसंधान साधले आहे. “व्हॅलेन्टाईन डे काही दिवसांवर आहे. शिवसेना आमचं जुनं प्रेम आहे. वैभववाडी नगरपंचायतीसाठी शिवसेनेला उमेदवारसुद्धा मिळणार नाही, अशी परिस्थिती शिवसेनेची आहे. शिवसेना हा पक्ष बाळासाहेब ठाकरेंचा आहे. त्यांच्या पक्षाची अशी परिस्थिती होऊ नये म्हणून व्हॅलेन्टाईन डेच्या निमित्ताने आम्ही ७ नगरेसवक शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याकडे पाठवत आहोत,” असे खरमरीत भाष्य भाजप आमदार नितेश राणे यांनी केले. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह सिंधुदुर्ग जिल्ह्याचा दौरा करून गेल्यानंतर वैभववाडी येथील भाजपचे ७ नगरसेवक शिवसेनेत प्रवेश करणार आहेत. यावर प्रतिक्रिया देताना राणे यांनी ट्विटरच्या माध्यमातून वरील भाष्य केले आहे.

नितेश राणे काय म्हणाले?

“व्हॅलेन्टाईन डे काही दिवसांवर आला आहे. शिवसेना आमचं जुनं प्रेम आहे. जुन्या प्रेमाला विसरायचं नसतं असं सगळे जण म्हणतात. वैभववाडीची परिस्थिती पाहिली तर तिथे उमेदवारसुद्धा मिळणार नाही, अशी शिवसेनेची परिस्थिती आहे. शिवसेना हा पक्ष बाळासाहेब ठाकरेंचा आहे. बाळासाहेबांचा आम्ही काल आदर केला. आजही करतो आणि कायम करत राहू. ते आमच्या हृदयात आहेत. मात्र, वैभववाडीत शिवसेनेची परिस्थिती वाईट आहे. बाळासाहेबांच्या पक्षाची अवस्था अशी होऊ नये, अशी आमची प्रमाणिक भावना आहे. म्हणून आमचे 7 नगरसेवक व्हॅलेन्टाईन डेच्या निमित्ताने उद्धवजींकडे पाठवतो आहे,” असे नितेश राणे म्हणाले.

पुढे बोलताना उद्धव ठाकरे यांनी मेडिकल कॉलेज उभारण्यासाठी आवश्यक असलेली सही दिली, त्याचा मोबदला म्हणूनही हे सात नगरसेवक देत असल्याचे ते म्हणाले. “मेडिकल कॉलेजसाठी नारायण राणे यांनी उद्धव ठाकरे यांना फोन केला होता. त्याला ठाकरे यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला होता. आमच्या मेडिकल कॉलेजसाठी त्यांनी सही केली. त्यांना आम्ही काही दिले तर ते घेणार नाहीत. म्हणून त्यांना मी हे सात नगरसेवक पाठवतो आहे,” असे नितेश राणे म्हणाले. तसेच, व्हॅलेन्टाईन डेच्या निमित्ताने उद्धवजींना मनापासून शुभेच्छा देतो, असे म्हणत त्यांनी शिवसेनेची खिल्ली उडवली.

काय आहे प्रकरण?

केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी ७ फेब्रुवारीला सिंधुदुर्ग जिल्ह्याचा दौरा केला होता. यावेळी त्यांनी शिवसेना तसेच महाविकास आघाडी सरकारवर जोरदार टीका केला. त्यांच्या या दौऱ्यामुळे कोकणात भाजप आणखी मजबूत होईल असे म्हटले जात होते. मात्र, शाह यांचा दौरा संपल्यानंतर वैभववाडी नगरपंचायतीतील भापजचे ७ नगरसेवक शिवसेनेच्या वाटेवर असल्याची चर्चा सुरु झाली. या सातही नगरसेवकांचा शिवसेना प्रवेश निश्चित झाला आहे. राणे कुटुंबीयांना शिवसेनेने दिलेली ही मोठी चपराक असल्याचे म्हटले जात आहे. याच पार्श्वभूमीवर राणे यांनी वरील वक्तव्य केले. दरम्यान, ७ नगरेवक गेल्यामुळे भाजपला कोणताही फरक पडणार नसल्याचा दावा भाजपने केला. वैभववाडीत 17 नगरसेवक हे भाजपचेच निवडून येणार असा दावा येथील भाजप कार्यकर्त्यांनी केला.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

“कमवतात इथे आणि पाठवतात पाकिस्तानला”; नाव न घेता साध्वी प्रज्ञा ठाकूर यांची शाहरुखवर टीका

News Desk

उन्हाळ्यात गोवा-कोकणात जाणार रेल्वेच्या जादा गाड्या

News Desk

हरणाच्या मटनाची अवैध विक्री

News Desk