HW News Marathi
महाराष्ट्र

आज मनसेच्या वर्धापन दिनानिमित्ताने होणार ‘शॅडो कॅबिनेट’ची घोषणा

मुंबई | मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्ताने पक्षाचे महाअधिवेशनात बोलविण्यात आले होते. या अधिवेशनात मनसेचा नवा झेंडा आणि शॅडो कॅबिनेटची घोषणा केली. यानंतर राज ठाकरे मनसेचा आज (९ मार्च) १४ वा वर्धापन दिन सोहळा साजरा होणार आहे. या पार्श्वभूमीवर मनसे त्यांच्या शेडो कॅबिनेटची घोषणा होणार आहे. या शॅडो कॅबिनेटमध्ये २५ जणांचा समावेश करण्यात येणार असून यात यामध्ये मनसे नेते बाळा नांदगावकर, नितीन सरदेसाई, संदीप देशपांडे, अमेय खोपकर आणि अभिजीत पानसे या मर्जीतल्या नेत्यांनाच स्थान दिल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे.

या शेडो कॅबिनट महाविकासआघाडी सरकारवर नजर ठेवण्यासाठी तयार केले आहे. यानुसार राज्य सरकारमधील प्रत्येक मंत्र्यावर नजर ठेवण्यासाठी मनसेतून एक-एका नेत्याची नेमणूक केली जाण्याची शक्यता आहे. ही संकल्पना इंग्लंड आणि अमेरिकेच्या धर्तीवर महाराष्ट्रात मनसे राबविणार आहे. मनसेचा यंदाचा वर्धापन दिन सोहळा मुंबईबाहेर साजरा होणार आहे. नवी मुंबईतील विष्णूदास भावे नाट्यगृहात मनसेच्या वर्धापन दिन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येणार आहे.

शॅडो कॅबिनेट म्हणजे नेमके काय?

सरकारच्या कारभारावर लक्ष ठेवण्यासाठी ‘शॅडो कॅबिनेट’ची मनसेकडून संकल्पना राबविण्यात येणार आहे. अठराव्या शतकात इंग्लंडमध्ये संसदीय लोकशाहीत कॅबिनेट पद्धतीला सुरुवात झाली. सरकारवर लक्ष ठेवणाऱ्या विरोधी पक्षाच्या कॅबिनेटला ‘शॅडो कॅबिनेट’ म्हणतात. कॅबिनेटमध्ये प्रथम श्रेणीचे १५ ते २० मंत्री असतात. राज्यमंत्री, उपमंत्री यांचा कॅबिनेटमध्ये समावेश नसतो. काँग्रेस-राष्ट्रवादी आणि शिवसेना यांच्या महाविकास आघाडी सरकारच्या कॅबिनेटमध्ये मात्र ३३ मंत्र्यांचा समावेश आहे. त्यामुळे मनसेच्या प्रत्येक नेत्याकडे दोन-दोन मंत्र्यांची जबाबदारी दिली जाण्याची चिन्हे आहेत.

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

मविआ सरकार ‘हे’ इतिहासातील सर्वात भ्रष्टचारी सरकार! – देवेंद्र फडणवीस

Aprna

इस्लामपूरात ३ दिवसांचा लॉकडाऊन, मेडिकल स्टोअर्स वगळता सर्व दुकान बंद राहणार

swarit

राज्यात दिवसभरात ६ हजार ३८४ जण करोनामुक्त; १०५ रूग्णांचा मृत्यू!

News Desk