HW News Marathi
महाराष्ट्र

शरद पवार म्हणतात याला तर कृषी मंत्रालय जबाबदार

नागपूर ‘बंदी असलेली कीटकनाशक बाजारात आल्यानं यवतमाळ मध्ये शेतक-यांचे बळी गेले. याला सर्वस्वी कृषी मंत्रालय जबाबदार असल्याचा आरोप राष्ट्रवादी कांग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी केला आहे. किटकनाशक नियंत्रणासाठी कायदा आहे व संस्थादेखील आहे. संस्थेच्या परवानगीशिवाय कुठलेही कीटकनाशक बाजारात येऊ शकत नाही. आम्ही आमच्या काळात नियमांचे काटेकोर पणे पालन केले. मात्र गेल्या 3 वर्षात काय झाले माहित नाही. या प्रकरणात संबंधित दोषींवर कठोर कारवाई झाली पाहिजे, अशी मागणी शरद पवार यांनी केली आहे. यावेळी त्यांनी भाजप सरकार वर जोरदार टिका केली.त्याच बरोबर

‘नियोजनाशिवाय कर्जमाफी प्रमाणपत्रांचे वाटप केल्याचा आरोप त्यांनी केला.

कर्जमाफी नियोजनशून्य पद्धतीने झाली. कर्ज न घेतलेल्या शेतकऱ्यांना पत्र आली. सुधारणा करण्यासाठी शासनाला 15 दिवसांचा वेळ देऊ,नाहीतर पुढील दिशा ठरवू, असा इशाराही शरद पवार यांनी यावेळी दिला. ‘नियमात अडकून न पडता शेतकऱ्यांना करा मदत असा सल्ला द्यायलाही ते विसरले नाही. परतीच्या पावसामुळे विदर्भात सोयाबीन आणि कापूस पिकाचे नुकसान झाले आहे . केंद्र व राज्य शासनाने नियमात अडकून न पडता शेतकऱ्यांना मदत केली पाहिजे . यासंदर्भात राज्य शासनाशी बोलणार असल्याचंही शरद पवार यांनी सांगितले.

दरम्यान, यावेळी शरद पवार यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या वादावर काहीच भाष्य करणार नसल्याचे सांगितले.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

‘आम्ही आणू बाप्पा तुमच्या घरी’, मनसेचे नवा अभिनव उपक्रम!

News Desk

महाविकासआघाडी सरकारने सत्तेसाठी फक्त मराठा समाजाचा वापर करून घेतला, विनायक मेटेंचा गंभीर आरोप 

News Desk

ओबीसी चिंतन बैठकीत सर्वपक्षीय नेत्यांचं विचारमंथन!

News Desk