HW News Marathi
महाराष्ट्र

कोरेगाव-भीमा प्रकरणात पोलिसांनी पुरावे तोडून-मोडून सादर केले…

मुंबई | कोरेगाव-भीमाची दंगल हा गेली अनेक वर्षापासूनचा वादाचा विषय आहे. आणि याच वादात हे तत्कालीन राज्य सरकारने पोलिसांच्या मदतीने घडविलेले षड्यंत्र होते. दंगलीच्या मुख्य सूत्रधारांना पाठीशी घालून जनतेची दिशाभूल करण्याचा तो डाव होता, असा गंभीर आरोप करत राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार ठिणगी पाडली आहे. दरम्यान या प्रकरणाची, आयपीएस अधिकाऱ्यांच्या नेतृत्वाखाली एसआयटीद्वारे चौकशी करावी, अशी मागणीही शरद पवारंनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्राद्वारे केली आहे. मुख्यमंत्र्यांना त्यांनी दोन पानी पत्र लिहीत कोरेगाव-भीमा दंगलीचे अनेक गंभीर मुद्दे उपस्थित केले आहेत.

१ जानेवारी २०१८ रोजी कोरेगाव-भीमा येथे २००वा विजयी दिवस साजरा करण्यासाठी लाखोंच्या संख्येने दलित बांधव एकत्रित जमले होते. दरम्यान याच सोहळ्यात काही समाजविघातक घटकांकडून मेळावा उधळण्याचा प्रयत्न झाला आणि त्याचे रुपांतर दंगलीत झाले. मात्र पोलिसांनी दंगलीस आदल्या दिवशी पुण्याच्या शनिवारवाडा परिसरात झालेल्या एल्गार परिषदेतील चिथावणीखोर वक्तव्ये कारणीभूत असल्याचाही निष्कर्ष काढला. तसेच दंगल घडविण्यात माओवादी संघटनेचा हात असल्याच्या संशयावरून अटकसत्र सुरू केले. माओवाद्यांशी संबंध असल्याचे दाखवून, व्यवस्थेविरूद्ध संघर्ष करणाऱ्या अनेक निरपराध व्यक्तींवर गुन्हेही दाखल करण्यात आले. दंगलीच्या आधी, ३१ डिसेंबर २०१७ रोजी क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले सामाजिक सेवा संस्थेने एल्गार परिषद आयोजित केली होती.

“भीमा कोरेगाव प्रकरणाच्या चौकशीसाठी एसआयटीची गरज आहे. कारण देवेंद्र फडणवीस सरकारने सत्तेचा चुकीचा वापर केला. फडणवीस सरकारने माध्यमांनाही चुकीची माहिती दिली. तसेच पोलिसांच्या मदतीने हे षडयंत्र घडवून आणले होते. मुख्य सूत्रधारांना पाठीशी घालून जनतेची दिशाभूल करण्याचा डाव होता, असा घणाघाती आरोप पवारांनी केला आहे. “पोलिसांनीही अनेक पुरावे तोडून-मोडून सादर केले आहेत, असाही आरोप पवारांनी पोलिसांवर केला. फडणवीस सरकारचे मुख्य उद्देश सरकारविरोधात आवाज उठवणाऱ्यांचा आवाज दाबणे आणि लोकशाही आंदोलन अयशस्वी करणे हे होते. तसेच भीम कोरेगाव प्रकरणात अटक करण्यात आलेले सर्वलोक हे समाजातील सन्मानित नागरिक आहेत”, असंही शरद पवारांनी या पत्रात म्हटले आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

ज्यांना मूठभर मतदारसंघ सांभाळता आला नाही…!

News Desk

फडणवीसांना अटक करा, रूपाली चाकणकरांची गृहमंत्र्यांकडे मागणी

News Desk

संजय राऊत महाभारतातले त्यामुळे धृतराष्ट्राला दिसत नाही ते त्यांना दिसतं, चंद्रकांत पाटलांचा खोचक टोला!

News Desk