HW News Marathi
महाराष्ट्र

शरद पवारांचा ‘तो’ अंदाज खरा ठरला, वर्तवलं होतं निकालाचं भाकित

मुंबई | देशातील ५ राज्यांमधील निवडणुकीचा निकाल जवळपास स्पष्ट झाला आहे. पश्चिम बंगालमध्ये ममता बॅनर्जी यांनी गड राखला आहे आणि १२०० मतांनी त्यांचा विजय झाला आहे. तर इतर राज्यांमध्ये भाजपला फारसं यश मिळताना दिसत नाही आहे. पाच राज्यांमध्ये निवडणूक प्रचाराचा धुरळा उडाल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी एक भाकित वर्तवलं होतं.

इतर चार राज्यांच्या तुलनेत आसाममध्ये भाजपची स्थिती चांगली आहे. त्यामुळे तिथे भाजप सत्ता राखेल. तर इतर राज्यांमध्ये दुसरे पक्ष विजयी होतील, असं शरद पवारांनी म्हटलं होतं. पवारांनी वर्तवलेला अंदाज खरा ठरताना दिसत आहे. केंद्रातील सत्तेचा पूर्ण गैरवापर करूनही भाजपला बंगालची सत्ता मिळणार नाही. ममता बॅनर्जी सत्ता कायम राखतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला होता.

आसाममधील १२५ पैकी ७७ जागांवर भाजपचे उमेदवार पुढे आहेत. त्यामुळे आसाममध्ये भाजपची सत्ता कायम राहील हे स्पष्ट झालं आहे. पुद्दुचेरीत विधानसभेच्या एकूण ३० जागा आहेत. यापैकी भाजप आणि मित्रपक्ष ८ जागांवर आघाडीवर आहेत. पश्चिम बंगालमध्ये भाजप सध्या ८६ जागांवर पुढे आहे. तर तमिळनाडूत भाजप आणि त्यांचा मित्रपक्ष एआयडीएमकेचा धुव्वा उडाला आहे. केरळमध्येही भाजपला अगदी नाममात्र यश मिळताना दिसत आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

बीडमधील शिवसैनिकांची आमदार संदीप क्षीरसागर विरोधात उद्धव ठाकरे व एकनाथ शिंदेंकडे थेट लेखी तक्रार

Aprna

महापुराच्या संकटातून जनतेला बाहेर काढण्यासाठी पवारांनी घेतली मुख्यमंत्र्यांची भेट

News Desk

‘मुंबई कोस्टल रोडमध्ये १ हजार ६०० कोटींचा भ्रष्टाचार’ – आशिष शेलार

News Desk