HW News Marathi
महाराष्ट्र

हीच ती वेळी, होय… मी विधानसभा निवडणूक लढविणार !

मुंबई | “होय, मी विधानसभा निवडणूक लढविणार,” घोषणा शिवसेना नेते आणि युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी केली आहे. वरळीतील विजय संकल्प मेळाव्यातून आदित्य ठाकरेंनी स्वत: वरळी मतदारसंघातून विधानसभा निवडणूक लढणार असल्याची घोषणा केली. आदित्य ठाकरेंनी भाषणादरम्यान म्हटले की, “होय, मी विधानसभा निवडणूक लढविणार, “असे म्हणत आदित्य ठाकरेंनी स्वत: उमदेवरांची घोषणा केली. निवडणूक लढविणारे आदित्या पहिले ठाकरे आहेत.

“शिवसैनिकांची परवानगी असेल तर मी शिवरायांच्या आशिर्वादीनी मी निवडणूक लढणार असल्याची घोषणा करतोय,” असे आदित्य ठाकरे म्हणाले. जनआशीर्दवाद यात्रेद्वारे मी महाराष्ट्र पिंजून काढला, या दौऱ्यातून लोकसभा निवडणुकीत जनतेने दिलेल्या मतदानाबद्दल आम्ही आभार व्यक्त करत होतो. या यात्रेदरम्यान मला जनतेकडून मिळालेले प्रेमानंतर मी विधासभा निवडणूक लढविणार असल्याचे ठरविले.

वरळी मतदारसंघातून विधानसभा निवडणूक लढणार असल्याची घोषणा स्वत: ठाकरेंनी केली आहे. “होय, मी विधानसभा निवडणूक लढविणार असल्याचे सांगितले.” मी हा निर्णय स्वत:च स्वप्नासाठी घेतला नाही, मला फक्त आमदार किंवा मुख्यमंत्री बनण्यासाठी हा निर्णय घेतला नाही. मी जनतेचे स्वप्न साकार यासाठी निवडणूक लढविण्या निर्णय घेतला आहे तर, नव महाराष्ट्र घडविण्यासाठी मी हा निर्णय घेतला आहे.

हीच ती वेळ, म्हणत निवडणुकीची केली घोषणा

“हीच ती वेळी आहे. लोकांच्या न्याय हक्काच्या न्यायची लढण्याची, हीच तीवेळी, बेरोजगारी मुक्त महाराष्ट्र करण्याची, प्रदुषण मुक्त महाराष्ट्र करण्याची, हीच ती वेळी महाराष्ट्रला सुजलाम सुफलाम करण्याची, कर्ज मुक्त महाराष्ट्र बनव्याची, तुम्ही माझ्यासोबत आहेत की, नाही असे म्हणत आदित्य ठाकरेंना उपस्थितींमध्ये ऊर्जा निर्माण केला. आदित्य ठाकरेंनी पुढे म्हणाले की, लढायला तयार आहात का?, जिंकायला तायरा आहात का?, अशा घोषणा देऊन त्यांनी वरळीतील मदारसंघात शिवसेनेची दाकत दाखविली आहे.

 

 

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

शासनाने मागासवर्ग आयोगाचे पुनर्गठन करावे, अन्यथा रोषाला सामोरे जावे लागेल – चंद्रकांत पाटील

News Desk

ज्येष्ठ शिवसेना नेते सुधीर जोशी यांचे वयाच्या ८१ व्या वर्षी निधन

Aprna

“उदय सामंत, शंकरराव गडाख, अब्दुल सत्तार हे १९६६ पासूनचे शिवसैनिक आहेत काय?”

News Desk