HW News Marathi
महाराष्ट्र

तिवरे धरण दुर्घटनेसाठी शिवसेनेचे आमदार जबाबदार !

मुंबई । चिपळूण येथील तिवरे धरण फुटल्यामुळे धरणच्या जवळपास असलेली ७ गावांना याचा फटका बसला आहे. या घटनेत १९ जण बेपत्ता झाले आहे. ज्यापैकी ११ जणांचे मृतदेह हाती लागल्याची माहीती प्रशासनाने दिली आहे. मृतांचा आकडा अधिक वाढत जाण्याची भीती व्यक्त केली जात आहे. या घटनेनंतर विरोधी पक्षान सरकारला चांगलेच धारेवर धरले आहे. विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी या घटनेसाठी शिवसेनेचे चिपळूणचे आमदार सदानंद चव्हाण यांना दोषी ठरवले आहे. चव्हाणांवर खूनाचा ३०२ (खूना) चा गुन्हा दाखल करण्याची मागणीही त्यांनी केली आहे.

तिवरे धरण फुटल्यामुळे झालेले मृत्यू हे सरकारच्या अनास्थेचे बळी असल्याचे वडेट्टीवार यांनी म्हटले आहे. यासाठी सरकारवर ३०२ गुन्हा दाखल करा आणि राज्यातील सर्व धरणांचे स्ट्रक्चरल ऑडीट करा, अशीही मागणी त्यांनी केली आहे. या घटनेची नैतिक जबाबदारी घेऊन जलसंपदा मंत्री गिरिष महाजन यांनी राजीनामा द्यावा, ही मागणी वडेट्टीवार यांनी केली आहे. गांधीभवन येथे झालेल्या पत्रकार परिषदेत वडेट्टीवार यांनी सरकारला या घटनेसाठी जबाबदार धरले आहे. यात परिषदेत वडेट्टीवार म्हणाले की, फक्त १९ वर्ष झाले, हे धरण बांधून तेव्हा कसे काय फुटू शकते ? यावरुन धरणाचे बांधकाम हे निकृष्ट दर्जाचे असल्याचे स्पष्ट होते असेही ते म्हणाले.

तिवरे धरण दुर्घटनेतील मृतपावलेल्याच्या कुटुंबियांनाबद्दल दु:ख | मुख्यमंत्री

तिवरे धरण दुर्घटनेतील जीवितहानीबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही तीव्र दु:ख व्यक्त केले आहे. या संदर्भातील मदतकार्याचा सातत्याने आढावा घेण्यात येत असून या घटनेस जबाबदार असलेल्या कारणांचा शोध घेऊन संबंधितांवर कारवाई करण्यात येईल, असेही त्यांनी स्पष्ट केले आहे. या घटनेचे वृत्त कळताच मुख्यमंत्र्यांनी तातडीने प्रशासकीय यंत्रणेशी संपर्क साधून मदत कार्याबाबत सूचना दिल्या आहेत.

तिवरे धरण दोषीवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा !

तसेच दुसरीकडे राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय प्रवक्ते नवाब मलिक यांनीही तिवरे धरण दुर्घटनेतील संबधित अधिकाऱ्यांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे. चिपळूण तालुक्यातील तिवरे धरणाच्या लिकेजबाबत स्थानिक लोकांनी आमदार, खासदार आणि संबंधित अधिकार्‍यांना कल्पना दिली होती. मात्र त्याकडे दुर्लक्ष केल्याने ही दुर्घटना घडली आहे, असा आरोपही मलिक यांनी केला आहे. दुर्घटनेतील मृत व्यक्तींच्या नातेवाईकांना शासनाने तात्काळ आर्थिक मदत जाहीर करावी, अशी मागणीही मलिक यांनी केली आहे.

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

वस्तुस्वरुपात मिळणारा शासकीय लाभ आता रोख स्वरुपात थेट लाभार्थ्यांच्या बँक खात्यात होणार जमा         

News Desk

“निवडणुकीतील आमिषाला राजेश कदम बळी पडले असावेत” –  राजू पाटील

News Desk

मुख्यमंत्र्यांचे हस्ते २७ जुलैला बीडीडी चाळींच्या पुनर्विकासाचे होणार भूमिपूजन

News Desk