HW News Marathi
महाराष्ट्र

आमच्या विश्वासार्हतेला तडा गेला !

मुंबई | शिवसेना खासदार अरविंद सावंत यांचा केंद्रीय अवजड उद्योग मंत्रीपदाचा राजीनामा दिला आहे. “मी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे माझा राजीनामा सुपूर्त केला आहे. मी राजनामा दिला म्हणजे तुम्ही समजून जा की, आम्ही एनडीएमधून बाहेर पडलो आहे,” असे सूचक विधान करत सावंत यांनी पत्रकारांच्या प्रश्नांना उत्तर दिले.

सावंत पुढे म्हणाले की, “निवडणुकीनंतर विश्वासार्हतेला तडा गेला. लोकसभेत महायुती तुटणार होती, मात्र, महायुती तुटू नये म्हणून ५०-५० फॉर्म्युला ठरला होता. मुख्यमंत्री पदासह सत्तेचे समान वाटपाचा निर्णय ठरला होता, मात्र, भाजप त्यांच्या दिलेल्या शब्दावरून पलटली.” असे सावंत यांनी भाजपवर निशाणा साधली.

सावंत पुढे म्हणाले की, भाजप मुख्यमंत्री आणि सत्तेचे समान वाटप असा कोणताच फॉर्म्युला ठरला नसल्याचे त्यांनी सांगितले. भाजपने उद्धव ठाकरेंना खोटे ठरविण्याचा प्रयत्न केला, म्हणून मी राजीनामा दिल्याचे देखील सावंत यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.सावंत यांनी आज (११ नोव्हेंबर) ट्वीट करत राजीनामा दिल्याची माहिती दिली होती. “शिवसेनेची बाजू सत्याची आहे. अशा खोट्या वातावरणात दिल्लीतील सरकार मध्ये तरी का रहायचे? आणि म्हणूनच मी केंद्रीय मंत्री पदाचा राजीनामा देत आहे,” असे ट्वीट करत भाजपवर आरोप केला आहेत.

राजीनाम्यानंतर नेमके काय म्हणाले अरविंद सावंत

बाळासाहेब ठाकरे आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे व पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आशीर्वादाने मी या देशाचा मंत्री म्हणून शपथ घेतली होती. मोदींनी माझ्याकडे अवजड उद्योग आणि सार्वजनिक उपक्रमची जबाबदारी दिली. मी सहा महिने ही जबाबदारी पार पाडली. मात्र, निवडणुकीनंतर राज्यात युतीसंदर्भात ज्याकाही घडामोडी घत आहेत. त्यामुळे युतीच्या विश्वासार्हतेला तडा गेला आहे. महायुतीला जनादेश मिळाला होता. भाजपध्यक्ष आणि भाजपने सत्तेच्या समसमान वाटपाचा दिलेला शब्द पाळला नाही. आपण असा शब्द दिल्याचेही त्यांनी नाकारले. आता राज्यात नव्या समीकरणासह सरकार स्थापन होत आहे. अशा परिस्थितीत केंद्रात मंत्री म्हणून काम करणे योग्य ठरणार नाही. त्यामुळे मी माझ्या मंत्रिपदाचा राजीनामा दिला आहे, असे अरविंद सावंत यांनी सांगितले.

 

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

पक्षीय भूकंपाचे हादरे शिवसेना पक्षप्रमुख ठाकरेंच्या खुर्चीलाही…

News Desk

नोंदणी करण्यापासून लस मिळेपर्यंतच्या पूर्ण प्रक्रियेत नागरिकांना मदत करा! : नाना पटोले

News Desk

राज्यसभा खासदार फौजिया खानही अन्नत्याग करणार, शरद पवारां पाठोपाठ घेतला निर्णय

News Desk