HW News Marathi
महाराष्ट्र

अमृता फडणवीसांच्या दाव्यावर शिवसेनेची प्रतिक्रिया

मुंबई | राज्याचे विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस या नेहमीच कोणत्या ना कोणत्या कारणाने चर्चेत असतात. आता अमृता फडणवीस यांनी नवं विधान केलं आहे, ज्यामुळे त्या पुन्हा एकदा चर्चेत आल्या आहेत. मुंबईतील वाहतूक कोंडीमुळे अनेक जोडप्यांचे घटस्फोट आहेत, असा दावा अमृता फडणवीसांनी केला आहे. मुंबईत जवळपास ३ टक्के जोडप्यांचा घटस्फोट हा वाहतूक कोडींमुळे होतो, असं विधान त्यांनी केलं आहे.

आज मुंबईत भाजपच्या कॅन्सरमुक्त अभियानाच्या कार्यक्रमात त्यांनी उपस्थिती लावली. यावेळी त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. किर्तनकार बंडातात्या कराडकर यांनी राजकीय महिला नेत्यांविषयी केलेल्या वादग्रस्त विधानानंतर राज्यभरात त्याचे पडसाद उमटताना दिसत आहेत. तर याबाबत अमृता फडणवीस यांना विचारण्यात आलं असता त्यांनीदेखील आपली नाराजी व्यक्त केली आहे. फडणवीस म्हणाल्या, “आपल्या देशात आधीच महिलांनी खूप भोगलं आहे. त्यामुळे महिलांच्या खासगी आयुष्यावर टिप्पणी करणे हे चुकीचे आहे, असं त्या म्हणाल्या.

त्या पुढे बोलताना म्हणाल्या की, “तुम्ही हे विसरुन जा की मी देवेंद्र फडणवीस यांची पत्नी आहे. जेव्हा मी काही बोलत असते तेव्हा मी एक सामान्य स्त्री म्हणून बोलत असते. मी सामान्य स्त्री म्हणून घराबाहेर पडते. मलाही रस्त्यांवरच्या खड्ड्यांचा त्रास होतो. आज मुंबईतील खड्ड्यांमुळे ट्राफिक जाम होत असून या ट्राफिकमुळे ३ टक्के घटस्फोट होतात. कारण आज मुंबईकरांना कुटुंबीयांना वेळ देता येत नाही”, असे त्या म्हणाल्या.

शिवसेनेची प्रतिक्रिया 

दरम्यान, आता शिवसेनेनेही याप्रकरणी खोचक प्रतिक्रिया दिली आहे. अमृता फडणवीस यांच्या या अनोख्या दाव्यावर शिवसेना नेत्या आणि मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी टोला लगावला आहे. अमृता फडणीसांनी फारच मोठा जावईशोध लावला असल्याचं पेडणेकरांनी म्हटलं आहे. यावर बोलताना पेडणेकर म्हणाल्या, “अमृता ताईंचा त्रास फार वेगळा आहे. अमृता फडणवीस आणि सामान्य स्त्री हे ऐकायला जरा वेगळं वाटतंय. कारण सामान्य स्त्रिया आपण येता-जाता रस्त्यावर बघतो. दरवेळी उठायचं आणि वेगवेगळं काहीतरी बोलायचं. आज तर वाहतुकीच्या कोंडीमुळे ३ टक्के घटस्फोट होतात असं बोलून फडणीसांनी फारच मोठा जावईशोध लावला आहे. म्हणजे यावर आता हसायचं की रडायचं असा प्रश्न निर्माण झाला आहे”, असं पेडणेकर म्हणाल्या.

मामींचा नवा शोध – मनीषा कायंदे

शिवसेनेच्या नेत्या मनीषा कायंदे यांनी देखील ट्वीट करत अमृता फडणवीसांवर निशाणा साधला आहे. “मामींचा नवा शोध, मुंबईतील ट्राफिकमुळे ३ टक्के घटस्फोट होतात. उत्तनच्या म्हाळगी प्रबोधिनीत भाजप कसले बौद्धिक घेते? कधी तरी मामीलाही बोलवा”, असा टोला मनीषा कायंदे यांनी अमृता फडणवीसांना लगावला आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

राज्यात पुढील दोन दिवस अतिवृष्टीचा हवामान खात्याने दिला इशारा

Aprna

नारायण राणे म्हणजे नेमकं रसायन काय हे संपूर्ण महाराष्ट्र जाणतो – विनायक राऊत

News Desk

संसदेच हिवाळी अधिवेशन पहिल्याच दिवशी वादळी ठरण्याची शक्यता!

News Desk