HW News Marathi
महाराष्ट्र

…तर सत्तेची आसने खाक झाल्याशिवाय राहणार नाहीत !

मुंबई | “मुख्यमंत्रीपदाचा मुद्दा माझ्यासाठी गौण आहे. मात्र, जे मुख्यमंत्री पदाची स्वप्न पाहत आहेत त्यांनी आधी राज्यातील शेतकऱ्यांच्या समस्या सोडविण्याकडे लक्ष द्यावे. कारण, शेतकऱ्यांच्या मनातला संताप वाढत गेला तर सत्तेची आसने खाक झाल्याशिवाय राहणार नाहीत”, असा खोचक इशारा शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी दिला आहे. ते श्रीरामपूरमध्ये बोलत होते. तसेच, माझे आणि मुख्यमंत्र्यांचे संबंध चांगले आहेत. मात्र, त्याचा वापर मी शेतकऱ्यांच्या भल्यासाठी करणार असल्याचे देखील उद्धव ठाकरे यावेळी म्हणाले.

“सध्या मुख्यमंत्रीपदाबाबत अनेक बातम्या येत आहेत. मुख्यमंत्री कोण होणार ? याबाबत चर्चा होत आहेत. मात्र, माझ्यासाठी हा प्रश्न गौण आहे. परंतु, ज्यांना मुख्यमंत्री पदाची स्वप्ने पडत आहेत त्यांनी राज्यातील शेतकऱ्याच्या समस्या सोडवाव्यात अन्यथा सत्तेची सर्व आसने खाक होतील”, असे म्हणत उद्धव ठाकरे यांनी भाजपवर निशाणा साधला आहे.

उद्धव ठाकरे यांनी यावेळी पीक विम्याच्या लाभार्थी शेतकऱ्यांची देखील माहिती घेतली. मात्र, या लाभार्थी शेतकऱ्यांचे प्रमाण अत्यल्प असल्याने शिवसेना शेतकऱ्यांना न्याय मिळवून देईल असेही उद्धव ठाकरेंनी म्हटले आहे. “आपला अन्नदाता सुखी राहिला पाहिजे. त्याचा बळी देण्याचे पाप मी कधीही करणार नाही. तुम्ही शिवसेनेची ताकद आहात. तुमच्या हक्काच्या आड कोण येतो ते पाहतो”, असेही उद्धव ठाकरे यावेळी शेतकऱ्यांना उद्देशून म्हणाले.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

अखेर राज्यपालांकडून निमंत्रण! अजित पवार म्हणाले…..

News Desk

चैत्यभूमीवर बाबासाहेबांना अभिवादन केल्यानंतर समीर वानखेडेंविरोधात घोषणाबाजी

News Desk

अविनाश आम्ही तुझ्या पाठीशी आहोत, ठाण्याला येतोय कोण अडवतंय बघूया – संदीप देशपांडे

News Desk