HW News Marathi
महाराष्ट्र

“…तर महाराष्ट्राची सत्ता हातात घेण्यासाठी पेटवायचा ‘तो’डाव होता”- यशोमती ठाकूर

यवतमाळ। गेल्या काही दिवसांपूर्वी त्रिपुरातल्या घटनेचे महाराष्ट्रातील काही शहरांमध्ये त्याचे पडसाद उमटले जाळपोळ, दंगली, हाणामारी अशा घटना महाराष्ट्रातील अमरावती नांदेड आणि मालेगाव या शहरात घडल्या, आणि याच पार्श्वभूमीवर आता महिला आणि बालकल्याण मंत्री यशोमती ठाकूर म्हणाल्यात की, लोक अमरावती शहरात आतंक करत होते. त्यावेळी काही मुस्लीम लोकं मंदिराचं रक्षण करत होते. तर, काही हिंदू लोकं मशिदीचं रक्षण करत होते. हाच माझा देश आहे. माझा धर्म आणि माझी जात हा तिरंगाच आहे, असं अमरावतीच्या पालकमंत्री आणि राज्याच्या महिला व बाल कल्याण विकास मंत्री यशोमती ठाकूर यांनी म्हटलं आहे. महाराष्ट्र पेटवण्याचं षडयंत्र होतं. महाराष्ट्राची सत्ता हातात घेण्यासाठी पेटवायचा डाव होता, असा आरोप आता महिला व बालकल्याण मंत्री यशोमती ठाकूर म्हणाल्या. यशोमती ठाकूर यांनी कोणाचेही नाव न घेता हा आरोप केलाय मात्र त्यांचा रोख हा विरोधी पक्षाकडे असल्याचे पहायला मिळालं.

आपल्या देशात काय चाललंय

त्रिपुराच्या या घटनेच्या पार्श्वभूमीवर आता यशोमती ठाकूर म्हणतात. राज्यात आणि देशात हिंसा वाढवण्याचं काम मोठ्या प्रमाणावर केलं जातंय. आपण संविधान दिवस साजरा करतोय आणि दुसरीकडे रामच आपला धर्म असल्याचं बोललं जातंय मात्र तिरंगा हाच आपला धर्म असला पाहिजे. संविधान दिवस आहे एकोप्याचा दिवस आहे. आजच्या दिवशी मी बोलली नाही तर कुठंतरी चुकल्या सारखं होईल, असं यशोमती ठाकूर म्हणाल्या. मी जय श्रीराम म्हणाले नाही, राम रहीम म्हटलं नाही. मी संविधान साजरा केला त्यासाठी वेळ झाला. अमरावतीत 12 तारखेला मोर्चा झाला, नको त्या घटना घडल्या. त्यानंतर मी फेसबुक लाईव्ह केलं. त्याच्या खालच्या कमेंट वाचल्या आणि आपल्या देशात काय चाललंय असा प्रश्न पडल्याचं यशोमती ठाकूर यांनी संविधान दिनी बोलताना स्पष्ट केले आहे.

देशात तिरस्काराची भावना वाढवण्याचं काम सुरु

पुढे बोलताना यशोमती ठाकूर म्हणाले आहेत की, जय श्रीराम म्हटलं की संपला का सगळं, संपला का संविधान? असा सवाल यशोमती ठाकूर यांनी केला. स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव आपण साजरा करतोय. देशात जातीय दंगली घडवल्या जातात. दोन्ही कट्टरपंथी हे चांगले मित्र असतात आणि आपल्याला येडं बनवतात. आपल्या देशात तिरस्काराची भावना वाढवण्याचं काम सुरु आहे, असं महिला व बालकल्याण विकास मंत्री यशोमती ठाकूर मराठी या विरोधी पक्षाचं नाव न घेत म्हणाल्या आहेत. त्या माजी आमदार अनंतराव देवरसकर यांच्या स्मृतिदिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात बोलत होत्या.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

राज्यात शिवसेना-भाजपचे सरकार येणार !

News Desk

“युतीत असताना बाळासाहेब ठाकरे तुमच्यासाठी हिंदुहृदयसम्राट होते, आता ते फक्त उद्धवजींचे वडील?”

News Desk

नवाब मलिक वैफल्यग्रस्त झालेत प्रविण दरेकरांची टीका!

News Desk