HW News Marathi
महाराष्ट्र

काहींना राज्यातील तरुणांची माहिती नाही !

मुंबई | युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांच्या जन आशीर्वाद यात्रेला गुरुवारपासून (१८ जुलै) सुरुवात झाली आहे. दरम्यान, या जन आशीर्वाद यात्रेवर काँग्रेसचे नवनिर्वाचित प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी टीका केली होती. “आदित्य ठाकरे हे महाविद्यालयीन वयाचे आहेत”, असे बाळासाहेब थोरात यांनी म्हटले होते. दरम्यान, बाळासाहेब थोरात यांच्या या टीकेला आता आदित्य ठाकरे यांनी प्रत्युत्तर दिले होते. “माझे पोस्ट ग्रॅज्युएशन झाले आहे. काही नेत्यांना राज्यातील तरुणांची माहितीच नाही”, असे म्हणत आदित्य ठाकरे यांनी बाळासाहेब थोरात यांना टोला लगावला आहे. ते अहमदनगरमध्ये बोलत होते.

आदित्य ठाकरे यांच्या जन आशीर्वाद यात्रेचा आज (२२ जुलै) पाचवा दिवस आहे. यंदाच्या लोकसभेत ज्यांनी शिवसेनेला मत दिले त्यांचे आभार मानण्यासाठी आणि ज्यांनी मत दिली नाहीत त्याची मने जिंकण्यासाठी ही यात्रा काढण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे. त्याचप्रमाणे कोणतेही पद मिळवण्यासाठी ही यात्रा नसल्याचे देखील स्पष्ट करण्यात आले. या पार्श्वभूमीवर आदित्य ठाकरे यांना मुख्यमंत्रीपदाबाबत पुन्हा प्रश्न विचारला असता ते म्हणाले कि, “मुख्यमंत्री कोण होईल हे माहित नाही. मात्र, संपूर्ण महाराष्ट्र भगवा होईल.”

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

केंद्राच्या कृषी कायद्याबाबत आज मंत्रिमंडळ उपसमितीची महत्त्वाची बैठक होणार

News Desk

नोकरीची सूवर्णसंधी! राज्यात १२,५०० पोलिसांची भरती

News Desk

अर्थव्यवस्था पुनरुज्जीवनाच्या उपाययोजना सुचवण्यासाठी ११ तज्ज्ञ सदस्यांची समिती स्थापन

News Desk