HW News Marathi
देश / विदेश

सोनिया गांधी घेणार उद्धव ठाकरेंची भेट!

नवी दिल्ली | देशात सध्या भेटीगाठींचं सत्र वाढत आहे. काँग्रेसच्या अध्यक्षा सोनिया गांधी येत्या २० ऑगस्ट रोजी विरोधी पक्षाच्या सर्व मुख्यमंत्र्यांशी सोनिया गांधी संवाद साधणार आहेत. यावेळी त्या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याशीही संवाद साधणार आहेत. त्यामुळे या बैठकीकडे संपूर्ण देशाचं लक्ष लागलं आहे.

विरोधकांची एकता मजबूत

राज्यसभेत काल(११ ऑगस्ट) झालेल्या गदारोहामुळे राजकारण आता चांगलंच पेटलं आहे. सोनिया गांधी आणि उद्धव ठाकरे यान्हची भेट होणार असल्याची माहिती संजय राऊतांनी दिली आहे. यावेळी बोलताना ते म्हणाले, ” विरोधकांची एकता मजबूत आहे. 20 ऑगस्ट रोजी काँग्रेसच्या नेत्या सोनिया गांधी देशातील विरोधी पक्षांच्या नेत्यांशी बोलणार आहेत. सर्व विरोधी पक्षाच्या मुख्यमंत्र्यांशी बोलणार आहेत. महाराष्ट्राचे मुख्यमंत्रीही त्यात सामील होणार आहेत”.

भेटीमागचं नेमकं कारण काय?

उद्धव ठाकरे आणि सोनिया गांधी यांच्या या भेटीकडे सगळ्यांचच लक्ष लागून आहे. राज्यसभेत झालेल्या प्रकारानंतर आज दिल्लीत विरोधकांनी संसदेपर्यंत मोर्चा काढला. केंद्र सरकारच्या रणनीतीविरोधात आवाज उठवण्यासाठी काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी येत्या २० ऑगस्टला काँग्रेसशासित राज्याच्या मुख्यमंत्र्यांशी संवाद साधणार आहेत. याबाबत शिवसेना खासदार संजय राऊत म्हणाले की, विरोधकांची एकजूट आहे. २० ऑगस्टला सोनिया गांधी काँग्रेसच्या राज्यातील मुख्यमंत्र्यांशी बोलणार आहेत. मुख्यमंत्री उद्धव ठाकरेही या बैठकीला उपस्थित राहतील अशी माहिती राऊतांनी दिली आहे.

महिला कमांडोज आणता ही कसली मर्दानगी

राज्यसभेत काल(११ ऑगस्ट) झालेल्या गोंधळावरून विरोधी पक्ष आता चांगलाच भडकलेला आहे. राज्यसभेत सुरू असलेला गोंधळ रोखण्यासाठी काल राज्यसभेत महिला कमांडोज बोलावण्यात आल्या होत्या. शिवसेना नेते संजय राऊत यांनी तर या प्रकरणावरून सत्ताधाऱ्यांवर जोरदार हल्लाबोल केला आहे. खासदारांना आवर घालण्यासाठी महिला कमांडोजना पाचारण करता ही कसली मर्दानगी आहे?, असा संताप संजय राऊत यांनी व्यक्त केला आहे.

राज्यसभेच्या गोंधळामुळे विरोधी खासदारांनी नाराजी व्यक्त केली आहे. “मार्शल बोलावणं ही काही नवी गोष्ट नाही. विधानसभेत आणि लोकसभेतही कमांडोज बोलावले जातात. पण जणू काही एखादी दंगल घडते आणि दंगल अटोक्यात येत नाही, तेव्हा सैन्याला बोलावलं जातं तसं बंदुका घेऊन सैन्य बोलावलं गेलं. भारात-पाकिस्तानच्या सीमेवरही असं सैन्य नसेल. तिथे सरळसरळ घुसखोरी होते. चीनचे लोकं घुसत आहेत. तिथे अशाप्रकारे व्यवस्था नाही आणि संसदेत खासदारांसमोर महिला कमांडोज होत्या. तो नॉर्थ कोरियाचा हुकूमशहा किम जोंग तो अशा महिला कमांडोज घेऊन फिरतो. काल संसदेतही आम्ही पुढे जाऊ नये म्हणून हे कमांडोज आणले. महिलांना आमच्यासमोर उभे करता ही कोणती मर्दानगी आहे”, असा हल्ला राऊत यांनी चढवला आहे.

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

न्या. लोया मृत्यूप्रकरण | चौकशीची मागणी सुप्रीम कोर्टाने फेटाळली

News Desk

…असे समजले बेअर ग्रिल्सला मोदींचे हिंदी

News Desk

मुंबई ते अहमदाबाद रेल्वेतील सीट्स रिकाम्याच रिकाम्या 

News Desk