HW News Marathi
महाराष्ट्र

गणेशोत्सवा दरम्यान चाकरमान्यांसाठी एसटी महामंडळाकडून विशेष भेट

मुंबई । दरवर्षी गणेशोत्सवासाठी मुंबईहून मोठ्या संख्येने कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यासाठी एसटी महामंडळाकडून या ही वर्षी एक विशेष भेट देण्यात येणार आहे. यावर्षी गणेशोत्सवाच्या निमित्ताने एसटी महामंडळाने दोन हजार २२५ जादा बससेवांची घोषणा केली आहे.

कोकणात जाणाऱ्या गणेश भक्तांसाठी एसटीकडून ८ ते १० सप्टेंबर या काळात नेहमीच्या गाड्यांव्यतिरिक्त जादा बसेस सोडण्यात येणार आहेत. गणेशोत्सवा दरम्यान कोकणात जाणाऱ्या सर्वच रेल्वे गाड्यांची तिकिटे आधीच फुल झालेली असतात.

एसटी महामंडळ दरवर्षी प्रवाशांसाठी जादा बसची ही सुविधा पुरवितात. एसटी महामंडळाने चिपळूण, मालवण, गुहागर, दापोली, देवरुख, खेड, रत्नागिरी, सावंतवाडी, महाड यामार्गावर जादा गाड्यांची व्यवस्था केली आहे.

पुण्यातूनही सोडण्यात येतील जादा गाड्या

पुण्यातील स्वारगेट, पिंपरी-चिंचवड, पुणे स्टेशन या बस स्थानकांवरून जादा गाड्या सोडण्यात येणार असून, त्यासाठी आरक्षण करण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे.

जास्त लोकांना विशेष सेवा

एकाच ठिकाणाहून कोकणात जाणाऱ्या 40 नागरिकांनी एकत्र मागणी केल्यास त्यांना संबंधित ठिकाणाहून जादा बस सोडण्याची व्यवस्थाही करण्यात येणार असल्याचे एसटी महामंडळाकडून सांगण्यात आले आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.
Some error occurred

Related posts

देशमुख तुम्ही दरोडा घालायचा आणि पोलिसांनी तुमचं हार टाकून स्वागत करायचं का? भाजपची टीका!

News Desk

कोस्टल रोडचे काम करताना वाहतूक बाधित होणार नाही याची दक्षता घेण्याचे पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरेंचे निर्देश

Aprna

#Coronavirus : मध्यरात्रीपासून देशांतर्गत सीमा बंद, सर्वांनी समजूतदारपणा दाखवणे गरजेचे !

swarit
शिक्षण

धनगर समाज सेवा संघ मुंबईच्या वतीने  बाबरवस्ती शाळेत शालेय वस्तूंचे वाटप 

News Desk

सांगली | जिल्हा परिषद प्राथमिक मराठी शाळा बाबरवस्ती( पांडोझरी) ता.जत जिल्हा सांगली येथे धनगर समाज सेवा संघ मुंबई यांच्या वतीने बाबरवस्ती शाळेत वह्या पेन व जिलेबी व पेढे वाटप करण्यात आले. मा.आनंदराव हाक्के यांच्या हस्ते वह्या व पेन वाटप करण्यात आले.

सामाजिक बांधिलकी जपणे व समाजाचे आपण काहीतरी देणे लागतो.माणूस कितीही मोठा झाला तरी ज्या मातीतून आपण गेलोय त्या मातीला आपण कधीच विसरणार नाही.कारण या मातीतूंच माणूस म्हणून जगण्याचे बळ मिळाले आहे.असे उद्गार आनंदराव हाक्के यांनी काढले.

शाळेची गुणवत्ता व शाळेत राबवले जाणारे उपक्रम, वृक्ष संगोपन,बोलक्या भिंती पाहून ते भारावून गेले.दिलीप वाघमारे या शिक्षकांनी राबवलेल्या विविध उपक्रमाची दखल घेऊन या सेवा संघाचे पदाधिकारी गेल्या दोन वर्षांपासून शाळेला भेटी देतात व विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करतात.

यावेळी शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्षा सविता मोटे,व शोभा बाबर,कविता कोरे विशाल गोड,सत्यवान हाक्के,केरुबा गडदे,उपस्थित होते यावेळी कार्यक्रमाचे सुञसंचलन व आभार दिलीप वाघमारे यांनी केले.

Related posts

महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना शुल्कामुळे  प्रवेश व परीक्षेपासून वंचित ठेवू नये

News Desk

पुणे येथे १८ एप्रिल रोजी साक्षर भारत प्रेरकांचे राज्यव्यापी भव्य धरणे आंदोलन

News Desk

…आता महाविद्यालयात येऊन भगवद्‌गीता वाचायची ?

swarit