HW News Marathi
महाराष्ट्र

पालघर प्रकरणावर विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम यांची प्रतिक्रिया

जळगाव | पालघर येथे जमावाकडून तीन लोकांची हत्या होणे हा अत्यंत दुर्दैवी प्रकार असून हेतू पुरस्सर हे कृत्य करण्यात आल्याचा आरोप हा दुर्दैवी असून या प्रकरणावर राष्ट्रीय रंगाने आरोप न करता कोरोना सारख्या परिस्थितीशी लढत असताना या घटनेचे राजकारण करू नये, अशी प्रतिक्रिया विशेष सरकारी वकील एडवोकेट उज्वल निकम यांनी दिली.

पालघर येथे जमावाकडून तीन लोकांची हत्या होणे हा अत्यंत दुर्देवी प्रकार आहे. अर्थात त्यातील दोघे साधू होते आणि त्यांच्या वाहन चालक होता. हे सगळे घडले तेंव्हा हा जमाव चिडलेला होता जमावाच्या हातात काठ्या होत्या आणि हा जमाव त्या तिघी निर्दोष व्यक्तीना पोलिसांसमक्ष मारत होता त्यामुळे यातून राजकीय आरोप-प्रत्यारोप करण्यात येते आहे. अत्यंत दुर्दैवी घटना होती पोलीस फक्त तीनच होते जमाव अफाट होता.

मी सध्या मोब लिंचींग धुळे जिल्ह्यात चालवत चालवत आहे ते पाच लोकांची देखील हत्या करण्यात आलेली होती. फरक एवढच आहे की धुळे येथील घटने मध्ये पोलीस हजर नव्हते. मात्र, इथे तीन पोलीस हजर होते. परंतु हेतुपुरस्कर हे करण्यात आले हा आरोप अत्यंत दुर्देवी आरोप आहे, असा मला सकृत दर्शनी वाटते. परंतु पोलिसांनी काही केले नाही पोलिसांनी त्या तिघांना वाचण्याचा प्रयत्न काही केले नाही, असे व्हिडिओ फुटे ज वरून दिसते आहे. अर्थात सरकार ने या तिघे पोलिसांना निलंबित केले आहे. सी आय डी कडे चौकशी देण्यात आली असून त्यांची खातेनिहाय चौकशी होईल.

आपण कोरोना शी लढतो आहोत या पार्श्वूमीवर या घटनेचे राजकारण करू नये, असे माझ स्पष्ट मत आहे जमावामुळे कदाचित पोलिस आपल्या जीव वाचवण्याचा करिता पोलिस घाबरले असतील अर्थात पोलिसांचे हे कृत्याचे कोणतेही समर्थन करू शकत नाही. पोलिसांची जबाबदारीच ही आहे दुसऱ्यांचे रक्षण करणे सद रक्षानाय खलनिग्रहणाय परंतु या परिस्थितीत पोलीस ते करू शकले नाही याला कारण पोलीस त्या जमावाला घाबरले असण्याची शक्यता आहे. स्वतः चा जीव प्यारा वाटले असेल काही कारणास्तव पोलिसांचे कृत्याचे समर्थन योग्य ठरत नाही. मात्र या प्रकरणावर कुठलेही राजकीय रंगाने कुणीही आरोप करून नये. धार्मिक सलोखा शांततेत ठेवला पाहिजे हेच आपले प्रत्येकाचे कर्तव्य आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

‘या’ सदस्यांचं होते विधानपरिषदेचं शेवटचं अधिवेशन

Aprna

भंडाऱ्यामध्ये वडापाची टॅक्सी नदीत कोसळून भीषण अपघात

News Desk

महाविकासआघाडी सरकार अस्थिर करण्याच्या भाजपच्या प्रयत्नांना यश मिळत नाहीये. त्यामुळे अशाप्रकारची टोकाची भूमिका! – शरद पवार

Aprna